शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अंध सहाय्यता दिन : अंधत्व निवारणात जळगाव जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:06 IST

मोतीबिंदू निवारणात सहा महिन्यातच ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण

जळगाव : मोतीबिंदू अथवा डोळ््यातील पडदा, बुबूळ यांच्या विविध व्याधींमुळे येणारे अंधत्व रोखून रुग्णांना नवदृष्टी देण्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम ठरला असून विविध दृष्टीदोष दूर करण्यासाठीचे प्रमाणही तीन वर्षांच्या तुलनेत वाढल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.अंधत्वासाठी मुख्य कारण ठरत असलेली मोतीबिंदूची लागण पूर्वी वयाच्या चाळीशीनंतर होत असे. मात्र आता अनेकांना चाळीशीच्या आतच मोतीबिंदू होऊ लागल्याने अंधत्वाचे प्रमाणही वाढत आहे. त्यात आता भर म्हणजे मोबाईल, संगणक यांच्या वाढत्या वापरामुळे दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्याला अंधत्व निवारणाचे उद्दीष्ट दिले जात आहे. या उद्दीष्ट पूर्तीमध्ये जळगाव जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. पूर्वी जळगाव जिल्ह्यात १५ ते २० टक्के उद्दीष्टपूर्वी होत असे. मात्र तीन वर्षांमध्ये वाढत्या जनजागृती व शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळे हे उद्दीष्ट पूर्ण होऊ लागले आहे. त्याचमुळे जळगाव जिल्ह्यातील कार्य पाहता यंदा जळगाव जिल्हा अव्वल ठरला आहे.१३ हजार ५०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियामोतीबिंदू निवारणासाठी यंदा जळगाव जिल्ह्याला २८ हजार १९४ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत १३ हजार ५०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना नवदृष्टी देण्यात आली. या सोबतच बुबूळ रोपणाचेही ( किरॅटो प्लास्टी सर्जरी) काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.५१० विद्यार्थ्यांना चष्म्याचा लाभसध्या मुलांमध्येही नेत्रविकाराचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचा दृष्टीदोष करण्यासाठीही प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट दिले जात आहे. यात यंदा शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ७० हजार मुलांच्या नेत्रतपासणीचे उद्दीष्ट जिल्ह्याला देण्यात आले. त्यात आतापर्यंत २७ हजार विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी ५१० विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना चष्मे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.शासकीय रुग्णालयांवर वाढता विश्वासजिल्हा रुग्णालयात असलेल्या अद्यायावत नेत्र शस्त्रक्रियागृहामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगत त्यामुळेच उद्दीष्टपूर्ती शक्य होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील अंधत्व निवारणाचे हे काम पाहता जामनेर उपजिल्हा रुग्णालयासाठीही नेत्र शस्त्रक्रियागृह मंजूर करीत त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.अंधत्व निवारणासाठी वाढत्या जनजागृतीसोबतच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येणाºया सुविधांमुळे अंधत्वाचे प्रमाण कमी होत आहे. यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमातंर्गत यंदा देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी आतापर्यंत ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

टॅग्स :Jalgaonजळगाव