शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पक्ष वाढीत ‘ओबीसीं’चे योगदान विसरुन चालणार नाही - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:37 IST

अन्याय कायम, कोअर कमेटीतून काढले, बैठकीसाठी साधे बोलावणे नाही

जळगाव : ओबीसी नेतृत्त्वावर अन्याय झाल्याचे मी कधीही म्हटलेले नाही तर पक्षातील वागणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना निर्माण झाली व मी ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली आहे, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगत पक्ष वाढीसाठी ओबीसी समाजाने परिश्रम घेतले आहे, हे विसरुन चालणार नाही, असेही सांगायला खडसे विसरले नाही न त्यांनी या समाजाच्या योगदानाची आठवण आपली नाराजी व्यक्त करताना जळगावात करून दिली.भाजपतील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रस्तरीय कमिटीची बैठक झाली. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा ही बैठक सुरू झाली.बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील आदींची उपस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे. विभागनिहाय आढावा घेण्यात आला. त्यानुसार त्या-त्या विभागातील आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यात दुपारी जळगाव बैठकीसाठी खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, खासदार डॉ. हीना गावीत, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री विजयकुमार गावीत, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे- खेवलकर माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापौर सीमा भोळे उपस्थित होते.गोपीनाथ मुंढे यांच्यावरही अन्याय झालामी देखील पक्षासाठी भरपूर केले, ‘हमाली’ केली, त्याचे फळ मला मिळाले. मला पक्षाने भरपूर दिले. मात्र माझा काही दोष नसताना मला पक्षाकडून डावलले जात आहे. दोषी असेल तर नक्की कारवाई करा, मात्र माझा काय दोष होता, हे पक्षाने मला सांगितले नाही व मला दूर सावरले. माझ्याप्रमाणे गोपीनाथ मुंढे यांच्यावरही अन्याय झाल्याचे प्रसंग आहे, त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला का टार्गेट केले जात असल्याचे ते म्हणाले.जीवाचे रान केल्याने पक्षाला चांगले दिवस आलेपत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, मला जातीबद्दल बोलायचे नाही, मात्र ही बाब पक्षासमोर आणून देणे गरजेचे असल्याचे आहे, असे सांगत गोपीनाथ मुंढे असो की इतर ओबीसी नेत्यांमुळे पक्षाचा चेहरा मोहरा बदलला व पक्ष इथपर्यंत आला. त्यामुळे ओबीसींचे नेतृत्व डावलून चालणार नाही असे स्पष्ट मत खडसे यांनी व्यक्त केले. ओबीसींनी जीवाचे रान करीत परिश्रम घेतले, त्यामुळे पक्षाला हे दिवस आले आहेत.घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे?खडसे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत भाजप पक्ष नेतृत्त्वाला लक्ष केले. खडसे पुढे म्हणाले, मी पक्ष सोडणार नाही, हे मी गेल्या २५ वर्षांत वेळोवेळी सांगितले आहे. पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनातदेखील नाही. जी व्यक्ती ४० ते ४२ वर्षे पक्ष वाढीसाठी तसेच पक्ष संघटन मजबुतीसाठी झटली आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतदेखील पक्ष संघटन उभे केले, त्याच्या मनात पक्षाविषयी चुकीचा विचार येऊच शकत नाही. मात्र काही जणांकडून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आज उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक असताना मला दुपारी ३.३० वाजता केवळ जिल्ह्याच्या आढाव्यासाठी बोलावण्यात आले. इतकेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमांनादेखील बोलाविले जात नाही.माझ्या राज्यभरातल्या समर्थकांना पुढे काय भूमिका घ्यायची? याबाबत विचारणा करणार आहे. घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे, याबाबतचा निर्णय समर्थकांच्या सांगण्यानुसार घेणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव