शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कडाक्याच्या थंडीमुळे केळी गारठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 11:27 PM

केºहाळेसह रावेर तालुक्यातील स्थिती : निसवण क्षमता मंदावली, मका, हरभºयाला ग्लुकोज

केºहाळे, ता.रावेर : गत काही दिवसांपासून थंडीचा पारा असह्य झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केळीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे करप्यासह चरक्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे ऐन निसवण्याच्या बहारात असलेली केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रब्बीतील हरभरा, मका, गहू या पिकांसाठी थंडी उपायकारक असते. परंतु केळीसाठी अतिथंडी अपायकारक ठरत आहे. थंडीमुळे केळीच्या पानांवर पिवळसरपणा आल्यामुळे चरका आला आहे. यामुळे पाने कोरडी पडण्यास सुरुवात म्हणजेच पाने निर्जीव होत आहेत. याचा परिणाम खोडाच्या वाढीवर प्रत्यक्ष झाला आहे. प्रकाश क्रिया मंदावल्यामुळे पानांच्या पेशीद्वारे मिळणारे ऊर्जास्त्रोत थांबतात व जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य घेण्यास मदत होत नाही. यामुळे खोडांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मृगबहार केळीच्या लागवड केलेल्या बेण्याप्रमाणे  जानेवारी महिन्यात बºयाच शेतकºयांच्या शेतातील केळीची खोडे निसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु याच वेळेत थंडीने घात केल्यामुळे केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. याचा थेट परिणाम केळीच्या घडावर होत आहे. कारण पुरेसे अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळे घडाची निसवण पूर्णत: होत नाही. परिणामी घड लहान पडत आहेत व सरासरी उत्पन्न घटणार आहे. केळी उत्पादनावर मात करण्यासाठी केळीचे घड निसवण्याची प्रक्रिया तेवढीच महत्त्वाची आहे. केळी लागवड व वाढ झाल्यानंतर खरा भाग निसवण्याचा असतो. निसवण चांगली व दमदार झाल्यास घडाचे वजन, केळीची रुंदी, लांबी मोठी असते, यामुळे उत्पादनाची सरासरी गाठता येते. आधीच काहीशा प्रमाणात असलेल्या करप्यामुळे केळी खोडांच्या खालच्या बाजूची पाने कोरडी पडलेली आहेत. मात्र थंडीच्या वाढीमुळे खोडांच्या वरील पानेसुद्धा पिवळी पडून निर्जीव होत असल्याने करप्याला बळ मिळत असते. त्यामुळे एकंदरीत केळीची वाताहत होते. (वार्ताहर) उत्पन्नावर परिणाम: उपाययोजना हव्यात...४कडाक्याची थंडी आणि करप्याची लागण यामुळे केळीच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता जाणकार शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. करप्यावर प्रभावी ठरणारी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची शेतकºयांची मागणी आहे. रावेर तालुक्यातील केळी बागांवर मोठ्या प्रमाणावर करप्याचे आक्रमण झाले आहे.  अतिप्रमाणात थंडी केळीकरिता अत्यंत नुकसानकारक आहे. यामुळे चरका व करप्याचे प्रमाण जास्त आहे. -प्रवीण महाजन, प्रगत शेतकरी, ऐनपूर