शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब हटविण्यासाठीच्या निधीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्यासाठीच्या दीड कोटींच्या निधीला अखेर विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. हे काम लवकर मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून या निधीला मंजुरी मिळवून घेतली आहे. विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच या पुलाचे कामदेखील सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात मुख्य अडथळा हा महावितरणचे विद्युत खांब हटविण्याचे काम ठरत आहे. हे खांब हटवले गेले नसल्याने, पुलाचे कामदेखील रखडत आहे. जोपर्यंत विद्युत खांब हटविले जाणार नाही तोपर्यंत पुलाचे कामदेखील होणार नाही. या रखडत जाणाऱ्या कामामुळे शिवाजीनगरातील नागरिक व जळगाव तालुक्यातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. या कामाला मंजुरी लवकर मिळाली तर पुढील कामाचा मार्ग सुकर होणार असल्याने, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व विभागीय आयुक्तांची व्हीसी झाली. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत कामांबाबत संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांना दिली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनीदेखील या कामाचा निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र शनिवारी महापालिका प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सोमवारीच महापालिकेला मिळालेला निधी महावितरणकडे वर्ग करून विद्युत काम हटविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडल्यामुळेच प्रशासकीय कामाला आली गती

शिवाजीनगरवासीयांसाठी जळगाव तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने या विषयावर पाठपुरावा केला. यामुळेच प्रशासकीय यंत्रणेला जाग येऊन या कामासाठी गती आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. पाच लाख नागरिकांच्या प्रश्न असल्याने या पुलाचे काम आता कोणत्याही प्रश्नासाठी प्रलंबित राहणार नाही अशीही ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.