शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही विमानसेवेचे उत्स्फूर्त प्रतिसादाचे ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सुरूवातीला काही महिने विमानसेवा बंद होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेण्याच्या ...

जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सुरूवातीला काही महिने विमानसेवा बंद होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सुचना देऊन शासनाने विमानसेवेला परवानगी दिल्यानंतर, सुरूवातीपासूनच जळगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ४०० ते ४५० पर्यंत असणारी प्रवाशांची संख्या, डिसेंबर महिन्यात थेट एक हजारांच्या वर पोहचली आहे. विशेष म्हणजे आठवड्यातुन तीनच दिवस विमानसेवा असतानांही प्रवाशांचा जळगाव विमान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

गेल्या वर्षी देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रेल्वे, बससह विमानसेवाही २३ मार्चपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने देशभरातील अंतर्गंत विमानसेवा सुरू झाल्यानंतर जळगावची विमानसेवाही जुलैमध्ये सुरू झाली होती. मात्र, जळगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, काही दिवसातच ही सेवा स्थगित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या जुलै महिन्यांतही १६४ प्रवाशांनी प्रवास केला होता. ऑगस्ट पर्यंत ही सेवा स्थगितच होती. त्यानंतर सप्टेंबरपासून जळगावची विमानसेवा नित्यनियमाने सुरू असून, शासनाच्या सुचनेनुसार कोरोनामुळे आठवड्यातून बुधवार, शनिवार आणि रविवार या तीनच दिवशी विमानसेवा सुरू आहे. त्यातही मुंबईची विमानसेवा फक्त दर रविवारीच सुरू आहे. असे असतानांही जळगाव येथून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याने विमान कंपनीने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

इन्फो

प्रवाशी संख्येत दर महिन्याला वाढ

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून जळगावची विमानसेवा सुरळीत सुरू असून, या महिन्यात फक्त ४३२ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर ऑक्टोंबर महिन्यात दुपटीने वाढ होऊन, ७५९ प्रवाशांनी प्रवास केला असून, नोव्हेंबर महिन्यात तर प्रवासी संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडून १ हजार १२४ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर गेल्या डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या काहीशी कमी झाली असली तरी,१ हजार ४५ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला आहे. जळगाव येथून विमानसेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत २१ हजारांहून अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, मुंबईच्या विमानसेवेला दररोजची परवानगी मिळाली तर, प्रवाशी संख्येत दहा पटीने वाढ होणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

नाईट लॅडिंगमुळे सेवा रद्दचे प्रमाण होणार कमी

नाईट लॅडिंगची सुविधा नसल्यामुळे, पूर्वी अनेकदा सेवा रद्द व्हायची, खराब हवामानामुळे जळगावला विमान न थांबता थेट अहमदाबादलाच रवाना व्हायचे. मात्र, आता नाईट लॅडिंगमुळे कमी दृश्यमानता असल्यावरही विमाने यशस्वीपणे उतरत आहे. त्यामुळे विमानसेवा रद्द होण्याचे प्रमाण कमी होऊन, प्रवाशांचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे.