शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

साहसी खेळांचा शिक्षणात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:08 IST

उमेश झिरपे : गिर्यारोहणामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो

लोकमत मुलाखत-जळगाव : साहसी खेळांचा समावेश हा शिक्षण पद्धतीत झाल्यास त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकासात वाढ होईल. गिर्यारोहण तसेच अन्य साहसी खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतंत्र गुण द्यावेत, यामुळे साहसी खेळांचा विकास होईल, असे मत प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.जळगावच्या आशा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी उमेश झिरपे हे जळगावला आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी लोकमतशी विशेष चर्चा केली.झिरपे म्हणाले की,‘ जगभरात १४ आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे सर करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील सात शिखरे आम्ही सर देखील केली आहे. महाराष्ट्रातील सध्याची गिर्यारोहणाची स्थिती यावर बोलताना झिरपे म्हणाले की, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये गिर्यारोहण आणि अ‍ॅडव्हेंचर टुरिझम सध्या वाढले आहे. या खेळांमध्ये सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. या क्षेत्रात देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रशिक्षीत व्यक्तींची गरज आहे. शासकीय पातळीवर देखील प्रयत्न सुरू आहेत.’ते पुढे म्हणाले की, गिर्यारोहण आणि अन्य साहसी खेळांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शाळेत जसे संगीत, चित्रकला, इतर खेळांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुण दिले जातात, त्याप्रमाणेच गिर्यारोहण, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग या साहसी खेळांना देखील स्वतंत्र गुण दिले जावे. त्याने या खेळांना प्रोत्साहन मिळेल. तसेच लहान वयात मुले सध्या मोबाईल आणि इंटरनेटकडे आकर्षित होत आहेत. त्यांच्यातील उर्जेचा योग्य वापर देखील होईल. लहान मुलांसाठी विविध साहसी खेळांच्या प्रशिक्षणाचे आयोजन ‘गिरीप्रेमी’ या संस्थेमार्फत केले जाते.’एव्हरेस्ट वीर उमेश झिरपे यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये या खेळांमुळे नेतृत्वगुण, संघ भावना वाढीस लागते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांना लाईफ स्किल्सचे शिक्षणच यातून मिळते.’

कांचनजुंगा चढाईसाठी कठीण शिखरमाऊंट कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असले तरी हे शिखर मला चढाईसाठी कठीण वाटते. हा पर्वत चढताना दगड आणि बर्फातून मार्ग काढावा लागतो. तर ६० ते ७० अंशाच्या कोनात बेस कॅम्पपासून ११०० मीटर चढाई करावी लागते.त्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. प्रत्येक शिखर हे आव्हानात्मक असले तरी त्याचा वेगळेपणा असतो, असेही ते म्हणाले