शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अपघात १६ टक्क्यांनी घटले; पण...

By सागर दुबे | Updated: April 13, 2023 15:30 IST

गेल्या काही वर्षांपासून बेशिस्त वृत्ती, बेदरकारपणा, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले होते.

जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर मार्गांवरील वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांचा बोजवारा उडाला असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जीवघेण्या अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय जळगाव जिल्ह्यातील अपघातील मृत्यूचेही प्रमाण घटले आहे. मात्र, अपघाताची संख्या जरी घटली असली तरी नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन चालवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेशिस्त वृत्ती, बेदरकारपणा, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले होते. यात नैसर्गिक कारणांपेक्षा मानवी दोषच अधिक दिसून आहेत. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात एकूण ८४३ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ७१९ इतकी आहे. परंतू, जानेवारी ते मार्च- २०२२ या कालावधीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च-२०२३ या कालावधीत एकूण अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झालेले असून अपघातातील मृत्यूची संख्येत १५ टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळत आहे.

चालकांचा निष्काळजीपणा...जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने दुचाकी, अवजड मालवाहू वाहन व कार यांचा समावेश आहे. सर्वाधिक अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. ज्यामध्ये वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न लावणे, सीटबेल्ट न वापरणे, पहाटेच्या वेळी चालकांना डुलकी येत असल्याने अपघात होत आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि ओव्हरटेक करण्याच्या कारणामुळेसुद्धा सर्वाधिक अपघात होत असल्याचा उपप्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे.

प्रवासी बस चालकांनी मालाची वाहतूक करू नका...खासगी प्रवासी बस चालकांनी त्यांच्या वाहनातून मालाची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवासी वाहतूक करणा-या वाहन चालकांनी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

ओव्हरटेक करू नका...महामार्गावर आणि शहरात दुचाकी चालविताना न चुकता हेल्मेट परिधार करावे. सर्व वाहन चालकांनी महामार्गावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेमध्ये वाहन चालवावे. लेन बदलवितांना व ओव्हरटेक करताना विशेष काळजी घ्यावी. मुख्यत: ओव्हरटेक करूणे टाळा. तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे. दुचाकी चालकांनी ट्रीपलसीट वाहन चालवू नये. कार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही आहेत नैसर्गिक कारणेधुके किंवा मुसळधार पाऊस, उष्णतेमुळे टायर फुटणे, अचानक जनावर रस्त्यात आडवे येणे, दरड कोसळणे अशा कारणांमुळे अपघात होतात मात्र याचे प्रमाण कमी असून मानवी चुकाच अधिक आहेत.

सन २०२२अपघात :  ८४३मृत्यू : ५६४जखमी : ७१९

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा...अपघात घट : १६%मृत्यूमध्ये घट : १५ %

टॅग्स :Accidentअपघात