शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आभाळमाया...... ‘वाघूर’ ९६ टक्क्यांवर तर ‘मेहरूण’ही ९० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST

जळगाव : गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून जिल्ह्यावर असलेल्या आभाळमायेमुळे जलसाठे तुडुंब भरलेेले आहेत. जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान ...

जळगाव : गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून जिल्ह्यावर असलेल्या आभाळमायेमुळे जलसाठे तुडुंब भरलेेले आहेत. जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणारे वाघूर धरण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. आठ तालुक्यांत तर १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून गिरणा धरणानेही पन्नाशी ओलांडून ते ५५.३२ टक्के भरले आहे. या सोबतच जळगाव शहरवासीयांचे आकर्षण असलेला मेहरूण तलावदेखील ९० टक्के भरला असून त्यात अजूनही आवक सुरूच आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्यासह पर्यटनाचा आनंद यामुळे द्विगुणित होत आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. त्यात दोन महिन्यात केवळ ३.३३ टक्के वाढ होऊन ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर जलसाठ्यात वाढ होऊ लागली. त्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे तर आणखी वेगाने वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ६४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

१२ दिवसांत वाघूर साठ्यात ३३ टक्क्यांनी वाढ

जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात १ सप्टेंबरपासून ते १२ सप्टेंबर या १२ दिवसांत तब्बल ३२.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे रविवार, १२ सप्टेंबर रोजी धरणसाठा ९५.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत धरण १०० टक्के भरण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला. त्यातही ८ सप्टेंबर रोजी तर धरणसाठ्यात थेट १२.५१ टक्क्यांनी वाढ होऊन हा साठा ८७.४२ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतरही दररोज दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होत जाऊन हा साठा ९५.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.