शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

खान्देशात १९ फिडरमधुन ८० टक्के विजेची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:11 AM

जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडळात गेल्या काही महिन्यांपासून १९ फिडरमधुन ७०ते ८० टक्के विजेची गळती होत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास ...

जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडळात गेल्या काही महिन्यांपासून १९ फिडरमधुन ७०ते ८० टक्के विजेची गळती होत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. ही गळती रोखण्यासाठी फिडरनिहाय १९ सहायक अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.

महावितरणतर्फे एकीकडे थकबाकीदारांविरोधात जोरदार कारवाई मोहिम राबविण्यात येत असतांना, दुसरीकडे विजेची चोरी करणाऱ्यांविरोधातही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात `अति हानी वाहिनी सुधार योजने अंतर्गंत` पहिल्या टप्प्यात १९ फिडरमधील विज गळती किमान पंधरा टक्क्यापर्यंत आणण्याचे आवाहन ठेवण्यात आले आहे. या विज गळतीत होणाऱ्या फिडरमध्ये जळगाव जिल्ह्यात ११ फिडर असून, धुळे जिल्ह्यात ७ तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एक फिडर आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या या दिवसाला फिडरमधुन ७० ते ८० टक्के विजगळती होत असल्यामुळे, महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या वीज गळतीमुळे ट्रान्सफार्मर जळणे, अचानक विज पुरवठा खंडित होणे, तसेच कमी-आधिक प्रमाणात विजेचा प्रवाह आदी समस्या उद्भवत आहे. परिणामी यामुळे नियमित विजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या गळतीला आळा घालण्यासाठी धडक कारवाई मोहिम हाती घेतली आहे.

इन्फो :

सर्वाधिक विजगळती जळगाव शहरात

जिल्ह्यातील विज गळती होणाऱ्या ११ फिडरपैकी ८ फिडर हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. यामध्ये सुप्रिम कॉलनी, मेहरुण, कवयित्री बहिणाबाई उद्यान परिसर, बळीराम पेठ, लाकुडपेठ, शिवाजीनगर आणि विठ्ठल पेठेचा समावेश आहे. येथील विजेची गळती रोखण्यासाठी गौरव वाघुळदे, चेतन सोनार, रोहित गोवे, हर्षल इंगळे, उमाकांत पाटील, अमोल चौधरी या सहायक अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इन्फो :

गळती रोखण्यासाठी जोरदार कारवाई मोहिम

ज्या १९ फिडरमधुन मोठ्या प्रमाणावर विजगळतीचे प्रमाण आहे, त्या फिडर परिसरातील आकोड्यांद्वारे विजेची चोरी करणाऱ्या नागरिकांचे आकोडे जप्त करुन, त्या ठिकाणी एरियल बंच टाकणे, तसेच फिडर परिसरातील प्रत्येक ग्राहकांचे मीटर तपासणे, यामध्ये फेरफार आढळल्यास संबंधित ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करुन, घराबाहेरील विद्युत खांब्यावर मीटर बसविणे, आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, या कारवाईत आतापर्यंत खान्देशातील ८३१ आकोडे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इन्फो :

महावितरणच्या जळगाव परिमंडळात एकूण १९ ठिकाणच्या फिडरमधुन विविध मार्गाने मोठ्या ७० ते ८० टक्के विजगळती होत असल्याचे समोर आले आहे. ही गळती रोखण्यासाठी महावितरणतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत असून, यासाठी फिडरनिहाय सहायक अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. महावितरणतर्फे लवकरच या गळतीला आळा घालण्यात येईल.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता महावितरण, जळगाव परिमंडळ.