शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील ७८ हजार शेतकऱ्यांनी घेतला ` महाकृषी उर्जा `अभियानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा ...

जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्च ते जून दरम्यान शासनाच्या सुचनेनुसार सर्व प्रकारच्या ग्राहकांना घरोघरी जाऊन रिडींग न घेता, सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, सरासरी वीज बील हे अवाजवी असल्याचे सांगत, सर्व प्रकारच्या ग्राहकांनी हे विजबिल भरण्याला विरोध केला होता. यामध्ये आधीच वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी तर हे वीजबिल भरण्याला तीव्र विरोध केला होता. मागील थकबाकी व चालु विजबिल मिळून, अनेक शेतकरी बांधवाना लाखोंच्या विजबिल आले होते. त्यामुळे महावितरणने कृषी पंपाचे वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदापासून `महाकृषी ऊर्जा` अभियान सुरू केले आहे. या योजने अंतर्गंत पहिल्या वर्षी थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकरी बांधवांना वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येत आहे. त्यानुसार खान्देशातील जून अखेर ७८ हजार शेतकऱ्यांनी थकीत विजबिलावर सवलत घेऊन, या अभियानाचा लाभ घेतला आहे.

इन्फो :

काय आहे `महाकृषी उर्जा `अभियान

राज्याच्या उर्जा मंत्रालयातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून, सलग तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानानुसार पहिल्या वर्षी विज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, यात व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या थकबाकी मध्ये एकूण ६६ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच अभियानाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला विजबिलावर ३० टक्के सवलत मिळणार असून, तिसऱ्या वर्षी या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला २० टक्केच सवलत मिळणार आहे.

या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.

इन्फो :

सर्वाधिक लाभार्थी जळगाव जिल्ह्यातील

या अभियानाचा आतापर्यंत खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, यात जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकरी बांधवांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी सवलतीचा लाभ घेऊन, ५४ कोटी ३८ लाखांचा विजबिल भरणा केला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ९७७ शेतकऱ्यांनी २१ कोटी १४ लाखांचे बिल भरले आहे. तर धुळे जिल्ह्यातील २१ हजार ८७३ शेतकऱ्यांनी १४ कोटी ४८ लाख इतके थकीत विजबिल भरले आहे.