शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 7:27 PM

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ साचल्याचे ‘मेरी’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे महत्वाच्या प्रकल्पावर ओढवली परिस्थिती ‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर

आॅनलाईन लोकमतवरणगाव, ता. भुसावळ, दि.२ : जळगाव जिल्हयातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘मेरी’ या संस्थेने मार्च २०१७ साली केलेल्या सर्वेक्षणात धरणाच्या साठवण क्षमतेच्या निम्म्यापेक्षा अधिक भाग गाळाने व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे.‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार हतनूर प्रकल्प उभारणीपासून गेल्या ३५ वर्षात धरणात ५४ .४५ टक्के गाळ जीवंत पाणी साठ्यात गोळा झाला आहे . यापूर्वी ‘मेरी’ने २००७ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या वेळी धरणातील मृत पाणीसाठ्यात ८१ टक्के गाळ साचला होता. वेळीच धरणातील गाळ उपसला गेला असता तर आज ही वेळ आली नसती असे जाणकाराचे मत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पावर ही परिस्थिती ओढवली आहे. हतनूर धरणाची ३८८ दश लक्ष घनमिटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमिटर गाळ साचल्याने प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आली आहे., आणि तीच मोठी भविष्याच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.कृषी सिंचनावर परिणामसातत्याने धरणात गाळ साचत राहिल्याने त्याचा फटका कृषी सिंचनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. धरण उभारणीपासून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनाकरिता ७० दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून तापी नदी व कालव्याव्दारे सोडले जात असे. परंतु ते कमी होवून फक्त रब्बी हंगामासाठी १८ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सिंचनास पाणी मिळत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. तर धरणातून (औद्योगिक पुरवठा ) बिगर सिंचनाकरिता ९४ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्हयात कृषी सिंचन व उद्योगावर दुष्परिणाम होईल.खर्चाची मोठी डोकेदुखीजाणकारांच्या मते आता धरणालील गाळ काढण्याकरिता येणाºया खर्चात नविन प्रकल्प उभा राहिल. एवढा यावर पैसा खर्च होईल.

टॅग्स :Damधरण