शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजस्थानमधील अपघातात अमळनेरचे सहाजण ठार, मृतांमध्ये दोन कुटंबातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश

By संजय पाटील | Updated: November 13, 2023 18:52 IST

जैसलमेर येथे पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

अमळनेर : जैसलमेर येथे पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर येथील सहा जणांचा रस्ता अपघातातमृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता राजस्थानातील बाडमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ घडली. मृतांमध्ये दोन परिवारातील प्रत्येकी तीनजणांचा समावेश आहे.

मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (५५, रा. बेटावद), योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे, ता. शिरपूर, ह.मु. पिंपळे रोड, अमळनेर) आणि दिनेश सूर्यवंशी हे परिवारासह दोन चारचाकीने राजस्थानात पर्यटनासाठी जात होते.

सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता बाडमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ यातील एका चारचाकीने (क्र. एमएच ०४ ९११४) कंटेनरला धडक दिली. त्यात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबुलाल मैराळे ऊर्फ सुरेखा धनराज सोनवणे (५०), त्यांची मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (५ वर्षे), गायत्री योगेश साळुंखे (३०) , त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे (७) आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे (१ वर्षे) असे सहाजण ठार झाले.

सुरेखा सोनवणे (मैराळे) या गलवाडे येथे जि.प. शाळेत शिक्षिका होत्या. गेल्याच महिन्यात त्यांची मांडळ येथे समायोजनात बदली झाली होती. या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना पालमपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार घेताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

सुदैवाने योगेश साळुंखे बचावले !घटनेच्या अर्धा तास आधी दिनेश सूर्यवंशी यांनी मोबाइलवर बोलणे केले आणि योगेश साळुंखे यांना धनराज सोनवणे यांच्या वाहनातून आपल्या वाहनात बोलावून घेतले. सोनवणे यांचे वाहन पुढे चालत होते व सूर्यवंशी यांचे वाहन मागे होते. वाहन बदलवल्याने योगेश साळुंखे बचावले.

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी बोलणे केले. राजस्थान येथील अशोक जैन यांचीही यासाठी मदत झाली. 

टॅग्स :JalgaonजळगावRajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू