शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पोलिसांची वाहनधारकांकडे २ कोटी ३२ लाखाची उधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

जळगाव : उद्योग व बाजारात उधारीवर व्यवसाय चालतो, असे मानले जाते. मात्र पोलिसांच्या कारवायाही आता उधारीवर होऊ लागल्या आहेत. ...

जळगाव : उद्योग व बाजारात उधारीवर व्यवसाय चालतो, असे मानले जाते. मात्र पोलिसांच्या कारवायाही आता उधारीवर होऊ लागल्या आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यात पोलिसांनी ८३ हजार ८३२ वाहनधारकांवर कारवाई करून २ कोटी ८४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड आकारला, मात्र त्यापैकी २१ हजार ४१३ वाहनधारकांनीच ५१ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड भरला. ६२ हजार ४१९ वाहनधारकांनी तब्बल २ कोटी ३२ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा दंड थकविला आहे. ही उधारी जमा करण्यासाठी पोलिसांना पकडलेल्या वाहनाला चालूची कारवाई करण्यापेक्षा मागील दंडाची पडताळणी करावी लागत आहे.

अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनधारक नियम पाळतात की नाही, याची पडताळणी व कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा यांच्याकडून वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते. विनापरवाना वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील विविध चौक, मुख्य मार्ग, महामार्ग आदी ठिकाणी कारवाईसाठी फिक्स पॉईंट लावण्यात येतात. आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक, अजिंठा चौक, कोर्ट चौक व टॉवर चौक या भागात सर्वाधिक कारवाई झालेली आहे.

विना हेल्मेट सर्वाधिक दंड वसूल

या पाच महिन्यांत विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. १५ हजार १८९ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७५ लाख ९४ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्याखालोखाल ट्रीपल सीट व विना लायसन्स वाहन चालविणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

महामार्गावर सर्वाधिक कारवाया

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव व भुसावळ येथे सर्वात जास्त कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय चाळीसगाव येथेही कारवाया केलेल्या आहेत. महामार्गावर दुचाकी चालवायची असेल तर हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. महामार्गावर वाहतूक जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महामार्गावरच मोठ्या संख्येने वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते.

जानेवारी ते मे अशी आहे कारवाई...

एकूण कारवाया : ८३,८३२

एकूण दंड : २,८४,८४,१००

दंड भरलेले वाहनधारक : २१,४१३

दंड न भरलेले वाहनधारक : ६२,४१९

एकूण वसूल दंड : ५१,८८,६००

एकूण थकीत दंड : २,३२,९५,५००