शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

जालन्यात पाणीबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 12:50 AM

गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला.

भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील गोकुळ येथे विहिरीतून पाणी शेंदताना दिपाली विष्णू शिंदे (१७) या मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाणीटंचाईने दिपालीचा बळी घेतला.दिपाली, तिची लहान बहिण रूपाली या आई लंकाबाई शिंदे यांच्यासोबत गावालगत असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धुत असताना दिपाली विहिरीतून पाणी शेंदून देत होती. दरम्यान तोल जाऊन ती विहीरीत पडली. आई व बहिनीने आरडाओरड करताच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु, डोक्याला मार लागून ती मृत पावली होती.तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील गोकूळ या एक हजार ८०० लोकसंख्या असलेल्या गावासाठी दानापूर येथे विहीर अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, विहिरीतील पाणी संपल्याने सरपंच समाधान शेरकर यांनी गोकूळ गावासाठी बानेगाव येथून प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, तलाठी अभय कुलकर्णी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केली नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशी माहिती सरपंच शेरकर यांनी दिली.पंधरा दिवसात तिघांचा मृत्यूगोकूळ येथे पंधरा दिवसापूर्वी केळना नदीच्या पात्रात वाळू चा उपसा करीत असताना दोन तरूण मुलांचा वाळू खाली दबून मृत्यू झाला होता. यात शनिवारी पुन्हा दिपालीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी गावात सर्वांनी गुढी उभारली होती. मात्र, या घटनेनंतर गावामध्ये कोणीही सण साजरा केला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातwater shortageपाणीटंचाई