शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

भोकरदन तालुक्यात प्रशासनाचे टंचाईत कागदी घोडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:49 IST

भोकरदन तालुक्यातील निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी शासनाने अधिग्रहित केल्या होत्या. मात्र त्यांना वर्षभरानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी शासनाने अधिग्रहित केल्या होत्या. मात्र त्यांना वर्षभरानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत.भोकरदन तालुक्यात यावर्षी कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ९० टक्के गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात भोकरदन शहरासह सध्या ६८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय ६८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी दररोज ५ लाख रूपयापेक्षा जास्त पैसा खर्च करण्यात येत आहे .एकूणच भोकरदन तालुक्यातील पाणीटंचाईने प्रशासन आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी देखील टंचाईच्या काळात ज्यांच्या विहिरी अधिग्रहित केल्या होत्या, त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा पाणी टंचाई तीव्र असताना शासनाला कोणत्या भरवशावर मदत करायची, असा सवाल शेतक-यांकडून केला जात आहे. या शेतक-यांच्या मागणीकडे सध्या लोकप्रतिनिधी ना प्रशासन लक्ष देत नाही. एकूणच सर्व काही दिखावा केला जात आहे. आढावा बैठका पार पडल्या मात्र, प्रत्यक्षात प्रशासन अद्याप हलले नाही. काही ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तांत्रिक बाबी उपस्थित करून अडवणूक केली जात आहे.यापूर्वी टँकर सुरू करण्यासह विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळावेत म्हणून शेतकरी पंचायत समितीत चकरा मारत आहेत. सध्या टँकर सुरू करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिका-यांना दिले आहेत. असे असले तरी ज्या गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली असतील तर तेथे टँकर सुरू करण्यास वेळ लागत आहे. अनेक गावांनी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पाणी टंचाई आणि दुष्काळ यामुळे भोकरदन तालुक्यात मोठी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रोजगार हमीची कामे ही वरवर केली जात असून, यंत्राव्दारे कामे करण्यावर भर दिला जात असल्याने शेतक-यांच्या हाताला काम मिळत नसल्याचे वास्तव आहे. याकडे आता जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितले की, शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे शेतक-याला ६०० रुपये प्रतिदिन विहीर अधिग्रहणाचा मोबदला देते. मात्र जेव्हापासून अधिग्रहण आदेश प्राप्त आहेत, त्या दिवसापासूनच हा मोबदला देण्यात येतो. शेतक-यानी पाणीपुरवठा करण्यासाठी एखाद्या गावाला विहीर दिली असेल त्यानी पंधरा दिवस अगोदर प्रस्ताव तयार करून ते कार्यालयात पाठवून अधिग्रहण आदेश घ्यावेत, जेणेकरून मोबदला मिळण्यास अडचण येणार नाही. मात्र, काही ठिकाणी गाव पातळीवर शेतकºयांनी नागरिकांना पाणी देण्याचे काम केले असल्याचे अनेक शेतक-यांनी आमच्याकडे सांगितले आहे़स्थळ पाहणी, मोबाईल टॅगिंग, अधिका-याचा ताळमेळ होत नसल्यामुळे अनेक गावांतील स्थळ पाहणीला वेळ लागत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़भोकरदन तालुक्यात संध्या ६८ टँकरने ३४ गावे व ४ वाड्यामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामध्ये ९ शासकीय टँकरचा समावेश असून, भोकरदन शहरासाठी २० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे़

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळwater transportजलवाहतूक