शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:45 IST

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले असून राजूरसह परिसरात पाणीसमस्येने रोैद्र रूप धारण केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.यावर्षी दुष्काळाच्या दाहकतेने नागरिक हैराण आहेत. त्यातच पाणी समस्येने सर्वत्र नागरिक त्रस्त आहे. चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून राजूरसह परिसरातील पंधरा गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा केला होता. तसेच सध्या शासकीय टँकरने भोकरदन शहरासह सुमारे ४० गावातील ग्रामस्थांना बाणेगाव धरणाच्या आसपासच्या विहिरी अधिग्रहण करून शासकीय टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात होती. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून बाणेगाव धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे आसपासच्या विहिरींचा जलस्त्रोत कमी पडला आहे. विहिरीत मुबलक जलसाठा उपलब्ध होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंतीची वेळ आली आहे. विहीरींची सुध्दा पाणीपातळी खालावल्याने भोकरदन शहराला होणाऱ्या टँकरच्या फे-या कमी करण्यात आल्या असून बाणेगाव प्रकल्पात गेल्या दोन वर्षापूर्वी चर खोदून जलस्त्रोत तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, धरणात खडक असल्याने तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे यावर्षी चर खोदण्याचा प्रयत्न झाला नाही.परिसरातील चाळीस गावांना होणा-या टँकरच्या फेºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथे खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून बाणेगाव चांधई एक्को धरणाच्या आसपासच्या विहिरीतून खाजगी टँकरचालक पाणी आणून विक्री करीत होते. परंतु, विहिरींची पाणी पातळी खालावल्याने टँकर चालकांना पाणी मिळत नाही.पाणी समस्या गंभीर बनल्याने टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. विकत पाणी घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.उन्हाळ््याच्या अंतिम टप्प्यात पाणी समस्येने रौद्र रूप धारण केल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची सोय करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन खाजगी टँकरच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ