शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:45 IST

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले असून राजूरसह परिसरात पाणीसमस्येने रोैद्र रूप धारण केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.यावर्षी दुष्काळाच्या दाहकतेने नागरिक हैराण आहेत. त्यातच पाणी समस्येने सर्वत्र नागरिक त्रस्त आहे. चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून राजूरसह परिसरातील पंधरा गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा केला होता. तसेच सध्या शासकीय टँकरने भोकरदन शहरासह सुमारे ४० गावातील ग्रामस्थांना बाणेगाव धरणाच्या आसपासच्या विहिरी अधिग्रहण करून शासकीय टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात होती. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून बाणेगाव धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे आसपासच्या विहिरींचा जलस्त्रोत कमी पडला आहे. विहिरीत मुबलक जलसाठा उपलब्ध होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंतीची वेळ आली आहे. विहीरींची सुध्दा पाणीपातळी खालावल्याने भोकरदन शहराला होणाऱ्या टँकरच्या फे-या कमी करण्यात आल्या असून बाणेगाव प्रकल्पात गेल्या दोन वर्षापूर्वी चर खोदून जलस्त्रोत तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, धरणात खडक असल्याने तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे यावर्षी चर खोदण्याचा प्रयत्न झाला नाही.परिसरातील चाळीस गावांना होणा-या टँकरच्या फेºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथे खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून बाणेगाव चांधई एक्को धरणाच्या आसपासच्या विहिरीतून खाजगी टँकरचालक पाणी आणून विक्री करीत होते. परंतु, विहिरींची पाणी पातळी खालावल्याने टँकर चालकांना पाणी मिळत नाही.पाणी समस्या गंभीर बनल्याने टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. विकत पाणी घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.उन्हाळ््याच्या अंतिम टप्प्यात पाणी समस्येने रौद्र रूप धारण केल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची सोय करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन खाजगी टँकरच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ