शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:45 IST

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले असून राजूरसह परिसरात पाणीसमस्येने रोैद्र रूप धारण केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.यावर्षी दुष्काळाच्या दाहकतेने नागरिक हैराण आहेत. त्यातच पाणी समस्येने सर्वत्र नागरिक त्रस्त आहे. चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून राजूरसह परिसरातील पंधरा गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा केला होता. तसेच सध्या शासकीय टँकरने भोकरदन शहरासह सुमारे ४० गावातील ग्रामस्थांना बाणेगाव धरणाच्या आसपासच्या विहिरी अधिग्रहण करून शासकीय टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात होती. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून बाणेगाव धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे आसपासच्या विहिरींचा जलस्त्रोत कमी पडला आहे. विहिरीत मुबलक जलसाठा उपलब्ध होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंतीची वेळ आली आहे. विहीरींची सुध्दा पाणीपातळी खालावल्याने भोकरदन शहराला होणाऱ्या टँकरच्या फे-या कमी करण्यात आल्या असून बाणेगाव प्रकल्पात गेल्या दोन वर्षापूर्वी चर खोदून जलस्त्रोत तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, धरणात खडक असल्याने तो प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे यावर्षी चर खोदण्याचा प्रयत्न झाला नाही.परिसरातील चाळीस गावांना होणा-या टँकरच्या फेºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच येथे खाजगी पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून बाणेगाव चांधई एक्को धरणाच्या आसपासच्या विहिरीतून खाजगी टँकरचालक पाणी आणून विक्री करीत होते. परंतु, विहिरींची पाणी पातळी खालावल्याने टँकर चालकांना पाणी मिळत नाही.पाणी समस्या गंभीर बनल्याने टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवले आहेत. विकत पाणी घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.उन्हाळ््याच्या अंतिम टप्प्यात पाणी समस्येने रौद्र रूप धारण केल्याने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची सोय करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन खाजगी टँकरच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरणdroughtदुष्काळ