शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

ग्रामस्थांची ‘जार’च्या पाण्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:40 IST

गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : १८ हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावाला मागील पाच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे. वापरायला टँकर आणि प्यायला जार... अन् पाणीटंचाईने ग्रामस्थ झाले बेजार असे म्हणण्याची वेळ सध्या गावकऱ्यांवर आली आहे.टेंभुर्णीचा पाणीप्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. टेंभुर्णीला पाणीपुरवठा करणा-या अकोला देव येथील जीवरेखा धरणात सध्या पाणीसाठा उपलब्ध असतानाही लोडशेडिंग, पाईपलाईन गळती, जनरेटर इंधनखर्च असमर्थता, टॅकर नामंजूर अशा अनेक कारणामुळे टेंभुर्णीकर सदैव तहानलेलेच राहिले आहे.गावातील प्रत्येक झोनला नळाचे पाणी एकदा येण्यासाठी ग्रामस्थांना जवळपास दिड महिना वाट पाहावी लागत आहे.अशा भीषण अवस्थेत ५ रूपयात २० लीटर पाणी देणारे ग्रामपंचायतचे फिल्टर प्लँट सध्या बंद पडल्याने संपूर्ण गावाची दारोमदार तीन खाजगी फिल्टर प्लंटवरच आहे. या ३ प्लंटवर मिळून दररोज जवळपास १८ हजार लीटर पाण्याची विक्री होत आहे. एरवी १० रूपयात भरून मिळणारे हे जार आता जागेवर १५ रूपयाला भरून मिळत आहे.याशिवाय वापरण्यासाठी ट्रँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ट्रँकरलाही जवळ पाणीसाठा नसल्याने ट्रँकरचे भाव ही ६०० ते ७०० च्या घरात जावून पोहचले आहे. सामान्य जनतेने ऐन दुष्काळात पाण्यासाठी एवढी रक्कम आणावी कुठून असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळWaterपाणी