शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ग्रामस्थांची ‘जार’च्या पाण्यावर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:40 IST

गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : १८ हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावाला मागील पाच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळाला पाणी येण्यासाठी महिना- दीड महिना लागत असल्याने आता १८ हजार टेंभुर्णीकरांना केवळ ‘जार’ च्या पाण्याचा आधार उरला आहे. वापरायला टँकर आणि प्यायला जार... अन् पाणीटंचाईने ग्रामस्थ झाले बेजार असे म्हणण्याची वेळ सध्या गावकऱ्यांवर आली आहे.टेंभुर्णीचा पाणीप्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. टेंभुर्णीला पाणीपुरवठा करणा-या अकोला देव येथील जीवरेखा धरणात सध्या पाणीसाठा उपलब्ध असतानाही लोडशेडिंग, पाईपलाईन गळती, जनरेटर इंधनखर्च असमर्थता, टॅकर नामंजूर अशा अनेक कारणामुळे टेंभुर्णीकर सदैव तहानलेलेच राहिले आहे.गावातील प्रत्येक झोनला नळाचे पाणी एकदा येण्यासाठी ग्रामस्थांना जवळपास दिड महिना वाट पाहावी लागत आहे.अशा भीषण अवस्थेत ५ रूपयात २० लीटर पाणी देणारे ग्रामपंचायतचे फिल्टर प्लँट सध्या बंद पडल्याने संपूर्ण गावाची दारोमदार तीन खाजगी फिल्टर प्लंटवरच आहे. या ३ प्लंटवर मिळून दररोज जवळपास १८ हजार लीटर पाण्याची विक्री होत आहे. एरवी १० रूपयात भरून मिळणारे हे जार आता जागेवर १५ रूपयाला भरून मिळत आहे.याशिवाय वापरण्यासाठी ट्रँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ट्रँकरलाही जवळ पाणीसाठा नसल्याने ट्रँकरचे भाव ही ६०० ते ७०० च्या घरात जावून पोहचले आहे. सामान्य जनतेने ऐन दुष्काळात पाण्यासाठी एवढी रक्कम आणावी कुठून असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळWaterपाणी