शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:54 PM

गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे.

- संजय देशमुख 

जालना : स्वत:चा मोठा उद्योग, व्यवसाय असताना ग्रामीण भागात जाऊन त्यांच्याशी सर्वार्थाने एकरूप होऊन तेथील केवळ पाणी समस्याच नव्हे तर त्या गावातील शिक्षण, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती तसेच धार्मिक कार्यक्रमांतून आपल्या परंपरा रुजवून त्यातून गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून लाहोटी दांपत्याने हा वसा जपला आहे.

आतापर्यंत जवळपास १५ पेक्षा अधिक गावांत जलसंधारणाचे काम केले असून, याचा श्रीगणेशा त्यांनी जालन्यापासून जवळच असलेल्या रोहनवाडी येथून केला. आज रोहनवाडी या गावाची तहान भागवण्यासह सिंचनाचा प्रश्न जवळपास निकाली निघाला आहे. धुळे जिल्ह्यातील देशी  गीरगार्इंचे संगोपन करून तेथील शेतीला पूरक व्यवसाय उभारला आहे. एवढेच नव्हे तर अद्ययावत दूध डेअरी उभारून शेतमजूराला मालक बनवण्याची किमया त्यांनी रोहनवाडीत साधली आहे.

अहंकार देऊळगाव, सारवाडीसह अन्य गावांमध्ये जाऊन या पती-पत्नीने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व तसेच जलसंधारण ही काळाची गरज किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले आहे. केवळ भाषणबाजी न करता गावाचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करून ते जलसंधारणाची कामे करतात. रसायनमुक्त शेती करण्यासाठी त्यांनी चार वर्षापूर्वी सेंद्रीय शेतीसह झिरो बजेटचे प्रणेते सुभाष पाळेकर यांचे आठ दिवसांचे विशेष शिबीर रोहनवाडीत घेतले होते. या शिबिरानंतर संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच झिरो बजेट शेतीचे महत्त्व पटले. यामुळे विषमुक्त पिकांच्या उत्पादनाला चालना मिळाली आहे. 

रोहनवाडीचा कायापालटरोहनवाडी येथे उत्पादित दूध तसेच सेंद्रिय भाजीपाला विक्री करताना ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून, यातून जो काही नफा उरतो, तो पूर्णपणे त्या शेतकऱ्यांना मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळाले आहे.  सामूहिक गायत्री यज्ञाच्या माध्यमातून सर्वांना एका धाग्यात बांधून आपल्या गावाच्या विकासाठीच्या संदर्भातील शपथ घेण्यात येते. असे विविध सामाजिक उपक्रम हे दाम्पत्य राबविते.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक