शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

१०५ कोरोना योद्ध्यांवर बेरोजगारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST

जालना : कोरोना काळात कोविड रुग्णालयातील कामकाजासाठी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या १०५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाचा ...

जालना : कोरोना काळात कोविड रुग्णालयातील कामकाजासाठी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या १०५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नसताना कामावरून कमी करण्यात आल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ आली असून, नोकरीत कायम ठेवावे, या मागणीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.

कोरोनाचा फैलाव झाला आणि जग ठप्प झाले. एखाद्याला कोरोनाची बाधा झाली तर त्याचे नातेवाईकही त्याच्यापासून दूर गेले. परंतु, कोरोना योद्ध्यांनी या बाधितांची सेवा केली. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू लागल्याने शासनाच्या वतीने जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर १०५ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाधित रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी काम केले. सध्या कमी झालेले कोरोना रुग्ण आणि संपलेला कराराचा कालावधी हे कारण देत प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

प्रशासनाने कामावरून कमी केल्याचे अचानक समजताच या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्या काळात कुटुंबाची काळजी न करता कोरोना बाधितांची सेवा केली. परंतु, कामावरून कमी केल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी रद्द करून जिल्ह्यातील रिक्त पदांवर कंत्राटी स्वरूपात नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

म्हणे, गरज पडली तर बोलावू

कोरोनाच्या काळात जिवावी पर्वा न करता या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांची सेवा केली. प्रसंगी अनेकजणांना कोरोनाची बाधा झाली तर अनेकजण क्वारंटाईन झाले. सध्याही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु, शासनाने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गरज पडली तर पुन्हा कामावर बोलावू, अशी भूमिका घेत प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

कोट

...तर आंदोलन करू

आम्ही कोरोनाच्या काळात आमच्या जिवाची, कुटुंबातील सदस्यांची काळजी न करता बाधितांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, शासन निर्णयामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आम्हाला रिक्तपदांवर नियुक्ती देऊन सेवेत घ्यावे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन केले जाईल.

शरद चव्हाण

कंत्राटी कर्मचारी

कोट

शासन निर्देशानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे. शासनस्तरावरून जो आदेश येईल, त्यानुसार प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जाईल.

अर्चना भोसले

जिल्हा शल्यचिकित्सक, जालना