शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:32 AM

दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.येथील चाणक्य मंगल कार्यालयात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शेतक-यांना जनावरांसाठी पशुखाद्य वाटप करण्यात आले़यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, यापूर्वीच्या दुष्काळातही शेतक-यांना मदत व्हावी याकरीता आंदोलन करणारी शिवसेनाच होती. राज्याच्या ताकदीसमोर केंद्रशासनाला झुकावे लागले. शेतक-यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतक-यांना माफी कशी करता त्यांना कर्जमुक्त करा, असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लावला. मी आज राजकारण करायला आलो नाही. जनावरांना चारा नाही, पाण्यावाचून गुरे तडफडताहेत जनावरांना चारापाणी कोण देणार? राज्यात शेतक-यांना कर्जमाफी मिळेना, मात्र कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटण्यातच ३२ हजार कोटी कर्जमाफीचे गेले. मात्र याचा हिशोब सरकार देत नाही. प्रधानमंत्री पिकविमा, प्रधानमंत्री फळबाग अशा विविध योजना अंतर्गत शेतकºयांनी कोट्यवधी रुपये शासनाकडे भरले. मात्र शेतक-यांना तुटपुंजा विमा मंजूर करण्यात आला आहे. तर बहुतांश शेतक-यांना विमाच मिळाला नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. याला केंद्र आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे ठाकरे यांनी टोला लावला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भगवी शाल देऊन स्वागत केले. यावेळी जि.प अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जयप्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, भगवान कदम, राजेंद्र ज-हाड राजेश जºहाड, गोरख लांबे, विलास पवार, भरत मदन, संजय बळप, अंबादास कोळसकर, मिर्झा शकूर बेग, नंदकिशोर दाभाडे, रवि बोचरे, श्रीराम कान्हेरे, अरूण डोळसे, राम पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.पंतप्रधान सोलापूरला आले मला अपेक्षा होती, ते दुष्काळासाठी काही मोठी घोषणा करून शेतक-यांना दिलासा देतील पण असे काही झाले नाही. यामुळे देशाचे पंतप्रधान शेतकºयांविषयी किती गंभीर आहेत, यावरुन दिसून येत असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली. यामुळे तुम्ही शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभे राहा, तुमच्या ताकदीवरच जे करता येईल, ते शिवसेना करेल असे यावेळी ठाकरे म्हणाले.यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.पशुखाद्य वाटपशिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतक-यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील दुष्काळात शेतक-यांच्या जनावरांसाठी १०० ट्रक पशुखाद्य वाटप करण्यासाठी आणले आहेत. दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाऊस पडेपर्यंत जास्तीत जास्त मदत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे करणार असल्याचे वचन दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरी