शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदीच्या अंमलबजावणीला नागरिक, प्रशासनाकडून तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले ...

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १४ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यापैकी १३ हजार ६०० पेक्षा अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. यामुळे दिलासा मिळून सर्वजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाले होते. कोरोना हद्दपार झाला या अविर्भावात सर्वजण होते, परंतु पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे चिंताही वाढली.

कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून पुन्हा ट्रेसेसिंग तसेच अलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे झाले आहे. मध्यंतरी सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हे सर्व प्रशासन करण्यास तत्पर आहे. परंतु मास्क आणि सॅनिटायझरसह स्वच्छतेकडे पुन्हा दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्रासपणे बाजारपेठ तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवर देखील नागरिक नियम पाळत नसल्याने पुन्हा एकदा झपाट्याने हा कोरोना फैलू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

वातावरण बदलानेही सर्दीचे रुग्ण वाढले

गेल्या आठवडाभरापासून रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन पडत आहे. त्यातच दोन ते तीन दिवसांपासून थंड वारे आणि अवकाळी पावसाने वातावरणात अचानक बदल झाले आहेत. काही गावांमध्ये गारपीट झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे देखील अनेक गावांमध्ये लहान-मोठ्यांना सर्दीचा त्रास जाणवत आहे.

सर्दीकडे दुर्लक्ष नको

वातावरणातील बदल तसेच पिण्याच्या पाण्यातील बदलांमुळे देखील सर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्दी झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले असून, सर्दी तसेच दोन ते तीन दिवस ताप असेल तर लगेचच चाचणी करून घेतल्यास पहिल्याच टप्प्यात असलेला कोरोना लक्षात येऊन त्यावरील उपाय करणे शक्य होतात. दुर्लक्ष केल्यास कोरोनाचा टप्पा हा मानवी श्वसन यंत्रणेत अधिक खोलवर जाऊन फुफ्फुसावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.