शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 01:03 IST

भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

विजय बावस्कर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.सध्या शेतात कामाचे दिवस असल्याने संपूर्ण दिवस येथील नागरिकांना पाणी आणण्यात घालावा लागत आहे. टँकर आल्यावर संपूर्ण गाव या विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी करते. विशेष म्हणजे गावात तीन दिवसांपासून टँकर आले नाही. तसेच परिसरात देखील तीन किलोमीटर अंतरावर कुठेच पाणी नसल्याने वरुड बु.गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे.वरुड बु. गावातील लोकसंख्या चार हजारांच्यावर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीकडून अपुऱ्या उपाययोजना केल्या असल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप येथील महिला व पुरुषांनी केला आहे.गावाला दानापूर येथील जुई धरणातील खोदण्यात आलेल्या विहिरीवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, धरण आटल्याने या विहिरीने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. सध्या गावात एक सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर आहे.या विहिरीत पद्मावती धरणातून गावासाठी सुरू केलेल्या एका शासकीय टँकरद्वारे पाणी टाकले जाते. त्याची देखील एकच खेप होते. टँकर येणार असल्याची माहिती मिळताच गावातील पुरूष, महिला व लहान मुले या विहिरीवर एक तास अगोदरच येऊन बसतात. टँकर आल्यावर हे टँकर सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत सोडल्यावर मात्र, पाणी भरण्यासाठी महिला व पुरुषाची या ठिकाणी स्पर्धा लागते. अनेक वेळा या ठिकाणी पाणी काढताना वाद देखील झाले आहेत. संपूर्ण गाव एकाच विहिरीवर पाणी भरत असल्याने अनेकांना पाण्याविनाच आपले रिकामे भांडे घेऊन परतावे लागत आहे. गावात गेल्या दोन महिन्यापासून एकच टँकर सुरू आहे.लोकसंख्येच्या तुलनेत हे टँकर अपुरे पडत असल्याने ग्रामपचांयतीने वाढीव टँकरचा प्रस्ताव पाठविणे गरजेचे होते. मात्र, येथील ग्रामपंचायतीने तसे केले नसल्यामुळे गावातील महिला व पुरुषांना घोटभर पाण्यासाठी मृत्यूशी खेळावे लागत आहे. गावात तीन दिवसांपासून पाण्याचे टँकर नसल्याने नागरिकांना भर उन्हात कोसो दूर जाऊन. डबक्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातून देखील आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.१९७२ पेक्षाही भयानक दुष्काळाचा अनुभव : पाणी नेऊ नये म्हणून विहिरी झाकल्याभोकरदन तालुक्यात १९७२ पेक्षा ही भयानक दुष्काळाचा अनुभव येथील जनता घेत आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई उग्ररुप धारण करु लागली आहे. अनेकांनी तर आपल्या विहिरीवरून कुणी पाणी नेऊ नये म्हणून विहिरीवर लोखंडी पत्रे टाकून विहीर झाकली आहे. यामुळे पाणी आणावे तरी कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाण्याच्या शोधात गोकुळ व मालखेडा येथील दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला होता. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. वरुड बु.गावात मुस्लिम बांधवांची जवळजवळ तीस घरे आहेत. सध्या मुस्लिम बांधवाचा पविञ रमजान महिना असल्याने सर्वांनी रोजा धरला आहे.एकीकडे कडाक्याचे ऊन तर दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम महिलांना विहिरीवर पाणी काढण्यासाठी जावे लागत आहे.माञ, त्यांना त्या ठिकाणी पाणी काढताना ग्लानी येऊ लागली आहे.त्यामुळे मुस्लिम वर्गातून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याच्या प्रतिक्रिया वरुड बु,येथील हसनूरबी शेख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ