शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:57 AM

येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना भागातील जलशुध्दीकरण केंद्राच्या दुुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. घाणेवाडी येथील जलाशयातील पाणी या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून, येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला होता. त्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी योजनेद्वारेच पाणी पुरवठा केला जात होता. परतीच्या पावसामुळे घाणेवाडी जलाशय तुडुंब भरला आहे. परंतु, वर्षभरापासून घाणेवाडीची जलवाहिनी बंद होती. त्यामुळे नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद पडले होते. या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम जालना पालिकेतर्फे सुरु करण्यात आले असून, पाणी शुध्दीकरणासाठी लागणारा ब्लिचिंग पावडरचा साठा मागवण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी विद्यमान आ. कैलास गोरंट्याल यांनी शहराला आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. जलशुध्दीकरण केंद्राचे काम झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठवड्यापासून आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेने केले ४८ एमएलडी पाण्याचे नियोजनअंबड येथे जायकवाडी- जालना योजनेच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेले २४ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी शहागड- जालना या योजनेदरम्यान कार्यान्वित करण्यात आलेले १५ एमएलडी क्षमतेच्या नादुरुस्त असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांच्या माध्यमातून जालना शहराला पाणीटंचाईच्या कालावधीत एकूण ४८ एमएलडी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन जालना पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत ६ एमएलडी आणि अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत १८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्षJalana Muncipalityजालना नगरपरिषद