शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आकाशच कोसळले! दहावीचा पेपर दिला, बाहेर येताच मुलीला कळले आई जग सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:00 IST

आई दवाखान्यात असताना मुलीची सुरु होती दहावीची परीक्षा 

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना): येथील वर्षा सारंग चौधरी ( 41) यांचा ब्रेन स्ट्रोकने रविवारी (दि. १९) मृत्यू झाला. ब्रेन डेड असल्याने नातलगांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने पाच जणांना जीवदान मिळाले. मात्र, आजारपण आणि मृत्यूची वार्ता दहावीच्या परीक्षा सुरु असलेल्या त्यांची मुलगी गायत्रीला देण्यात आली नव्हती. आज गायत्रीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. पेपर देऊन बाहेर येताच गायत्रीला आई जग सोडून गेल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर गायत्रीस थेट अंत्यसंस्कार स्थळी नेण्यात आले. 

या बाबतची माहिती अशी की, भोकरदन येथील सारंग चौधरी यांचा मुलगा देव हा सातारा येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याला सोडण्यासाठी सारंग चौधरी, पत्नी वर्षासह अक्कलकोट, पंढरपूर असे देवदर्शन करत 14 मार्च रोजी सातारा येथे पोहचले. मात्र अचानक वर्षा यांना त्रास जाणवू लागला. स्थानिक हॉस्पिटलमधील उपचारानंतर त्यांना पुणे त्यानंतर 16 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . येथे उपचारानंतर डॉक्टरांनी वर्षा यांना ब्रेन डेड घोषित केले. नातेवाईकाने अवयदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाने पाच जणांना जीवदान मिळाले आहे. त्यानंतर आज त्यांचे पार्थिव भोकरदन येथे नेण्यात आले. दरम्यान, वर्षा यांची मुलगी गायत्रीची दहावीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे गायत्रीला आईचे आजारपण आणि मृत्यूची वार्ता देण्यात आली नव्हती. आज गायत्रीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. दुपारी पेपर झाल्यानंतर बाहेर येताच गायत्रीस आईच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. 

आई दवाखान्यात असताना मुलीची सुरु होती परीक्षा गायत्रीला आईची तब्येत ठीक नाही अशी माहिती होती. नातेवाईकांनी तिला आईची तब्येत बरी असून तून परीक्षा झाल्यास तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जा असे सांगितले होते. मात्र, आज पेपर देऊन बाहेर येताच आई जग सोडून गेल्याचे कळताच तिच्यावर आभाळच कोसळले. दुपारी शोकाकुल वातावरणात वर्षा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईची शेवटची भेट होऊ शकली झाली नाही म्हणून गायत्रीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थितांनी देखील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :Jalanaजालनाssc examदहावी