शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

गोड उसाची दाहक कहाणी; शेतकरी पती-पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 1:30 PM

बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या केल्या. परंतु, कारखाना ऊस तोड करायला तयार नाही.

जालना: शेतातील ऊस तोडणी अभावी वाळत असल्याने शेतकरी पती-पत्नीने टोकाचा निर्णय घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. मोठ्या आशेने वाढवलेल्या उसाची विनवणी करूनही साखर कारखाना तोडणी करायला तयार नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने गोड उसाची आणखी एक दाहक कहाणी पुढे आली आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोदगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी सुभाष सराटे यांनी यंदा ८ एकरवर ऊस लागवड केली आहे. जीवाचे रान करून त्यांनी पत्नी मीरासोबत उसाची निगा राखली, आता कारखान्याला ऊस जाईल आणि कष्टाचे पैसे मिळेल या आशेवर दोघे होते. मात्र, ऊस तोडणी करण्यासाठी कारखाना टोळीच पाठवत नसल्याने ते हतबल झाले. 

बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या केल्या. परंतु, कारखाना ऊस तोड करायला तयार नाही. त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती-पत्नीने आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. काही कळायच्या आत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दोघांनी सोबत आणलेली किटकनाशकाची बाटली तोंडला लावत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही बाब तिथे असलेल्या पोलिसांनी पाहताच प्रसंगावधान राखत कदम पती-पत्नीला त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कडील कीटकनाशकाची बॉटल पोलिसांनी वेळीच हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना