शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:43 AM

नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ९७ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन, हा निधी तातडीने शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतक-यांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती विहित वेळेत संकलित करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.दुष्काळी निधी वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच क्रीडा विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री लोणीकर बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के. राठोड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, तहसीलदार बिपीन पाटील, कदम, सुमन मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी खतगावकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, २०१८ च्या खरीप हंगामात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीची रक्कम दोन टप्यात देण्यात येणार आहे. राज्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ९०० कोटी आणि दुसºया टप्प्यात २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही नुकतीच राज्याला दुष्काळ निवारणासाठी ४ हजार ७१४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार २ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्यात वितरित करण्यात आला आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये कमाल २ हेक्टरपर्यंत मदत, कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराने ५० टक्के म्हणजे ३ हजार ४०० रुपये बहुवार्षिक पिकांसाठी प्रथम हफ्ता ८ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ५० टक्के म्हणजे ९ हजार रुपये प्रत्येक शेतकºयांना ही भरपाई मिळेल.१५ दुष्काळी अनुदान वाटपासंदर्भात जालना जिल्ह्यातील ८५४ गावातील ७५ हजार ४३३ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून ४० हजार ७९१ शेतक-यांच्या खात्यावर १५ कोटी ९५ लक्ष ४९ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती संकलित करण्यात येत असून, आजपर्यंत जिल्ह्यातील ९७१ गावांपैकी ३७८ गावातील एक लाख ४० हजार ९२३ शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळBabanrao Looneykarबबनराव लोणीकर