शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

जालना बाजारपेठेत डाळीमधील तेजी भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:17 IST

बाजारगप्पा : जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे.

- संजय देशमुख (जालना)

जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे. ही तेजी आणखी काही महिने राहील, असे जाणकारांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समितीतील अन्नधान्याची आवक ४० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी डाळीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यावेळी सरकारने डाळींची निर्यात बंद करून ती नाफेड तसेच राज्य सरकारच्या मार्फत खरेदी केली होती. शासनाकडे जवळपास ३० लाख टन डाळींचा साठा होता, तो आता पाच लाख क्विंटलवर आला आहे. तसेच यंदा पावसाने दगा दिल्याने तूर, हरभऱ्याचे उत्पादन नगण्य होणार असल्यानेदेखील डाळींचे भाव हे वाढतच राहतील, असे सांगण्यात आले.

गेल्या सहा महिन्यांचा विचार करता यंदा दिवाळीतही बाजारपेठेतील डाळी वगळता अन्य अन्नधान्यात तेजी आलेली नव्हती. मालाला ज्याप्रमाणे उठाव असायचा तोदेखील यंदा दिसून आला नाही. बाजारपेठेत सध्या ज्वारी, बाजरीची आवक बऱ्यापैकी आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी, भाव नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. मोसंबीला तेलंगणा, हैदराबादमध्ये मागणी बऱ्यापैकी आहे. भाज्यांनाही उठाव नसल्याचे आठवडी बाजारात दिसून आले. भेंडी आणि शिमला मिरचीच्या भावामध्ये किंचित वाढ दिसून आली.

मोंढ्यात गहू २१०० ते २७००, ज्वारी २४०० ते ३०००,  बाजरी १४०० ते २३००, मका १४०० ते १५२४, तूर ४४०० ते ५०००, चना ३८०० ते ४३००, सोयाबीन ३३२५ ते ३३५०, मक्याची आवक ३ हजार क्विंटल, सोयाबीनची आवक केवळ १००० क्विंटल असून, तूर अद्यापही आलेली नाही. ज्वारी, बाजरी, हरभरा ५०० क्विंटल आहे. साखरेचे भाव ३२२० ते ३३०० रुपये क्विंटल असून, अनेक कारखान्यांना गाळपाचा परवाना नसतानाही त्यांनी साखरेचे उत्पादन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातून इंडियन शुगर, तसेच अनेक बड्या कारखान्यांची साखर बाजारपेठेत दाखल झाली आहे. 

यंदा दुष्काळामुळे डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.घटल्याने डाळींचा साठा करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसून येत असल्याने खरेदीत तेजी आली आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत डाळींच्या भावामध्ये तेजी अपेक्षित असल्याचे बोलले जाते. सरकारकडे असलेल्या डाळीच्या साठ्याची दोन वर्षाची मर्यादा आता संपत चालल्याने डाळींचा दर्जा घसरत आहे, त्यामुळे ही डाळ आता गोदामातून कशी बाहेर काढता येईल या विचारात शासकीय यंत्रणा असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी एक हजार तीनशे रुपयांवरूनथेट दोन हजार चारशेरुपयांवर पोहोचली आहे.

जालना जिल्हा मोसंबीचे आगर म्हणून ओळखल्या जाते. सध्या चांगल्या मोसंबीला २० हजार ते २६ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. तर मध्यम स्वरुपाच्या मालाला १५ ते २० हजार रुपये टन भाव मिळत आहे. दिल्ली, राजस्थान, कोलकाता या भागातही मोसंबीला मागणी असल्याची माहिती मोसंबी अडत असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार