शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारपेठेत डाळीमधील तेजी भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:17 IST

बाजारगप्पा : जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे.

- संजय देशमुख (जालना)

जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे. ही तेजी आणखी काही महिने राहील, असे जाणकारांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समितीतील अन्नधान्याची आवक ४० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी डाळीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यावेळी सरकारने डाळींची निर्यात बंद करून ती नाफेड तसेच राज्य सरकारच्या मार्फत खरेदी केली होती. शासनाकडे जवळपास ३० लाख टन डाळींचा साठा होता, तो आता पाच लाख क्विंटलवर आला आहे. तसेच यंदा पावसाने दगा दिल्याने तूर, हरभऱ्याचे उत्पादन नगण्य होणार असल्यानेदेखील डाळींचे भाव हे वाढतच राहतील, असे सांगण्यात आले.

गेल्या सहा महिन्यांचा विचार करता यंदा दिवाळीतही बाजारपेठेतील डाळी वगळता अन्य अन्नधान्यात तेजी आलेली नव्हती. मालाला ज्याप्रमाणे उठाव असायचा तोदेखील यंदा दिसून आला नाही. बाजारपेठेत सध्या ज्वारी, बाजरीची आवक बऱ्यापैकी आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी, भाव नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. मोसंबीला तेलंगणा, हैदराबादमध्ये मागणी बऱ्यापैकी आहे. भाज्यांनाही उठाव नसल्याचे आठवडी बाजारात दिसून आले. भेंडी आणि शिमला मिरचीच्या भावामध्ये किंचित वाढ दिसून आली.

मोंढ्यात गहू २१०० ते २७००, ज्वारी २४०० ते ३०००,  बाजरी १४०० ते २३००, मका १४०० ते १५२४, तूर ४४०० ते ५०००, चना ३८०० ते ४३००, सोयाबीन ३३२५ ते ३३५०, मक्याची आवक ३ हजार क्विंटल, सोयाबीनची आवक केवळ १००० क्विंटल असून, तूर अद्यापही आलेली नाही. ज्वारी, बाजरी, हरभरा ५०० क्विंटल आहे. साखरेचे भाव ३२२० ते ३३०० रुपये क्विंटल असून, अनेक कारखान्यांना गाळपाचा परवाना नसतानाही त्यांनी साखरेचे उत्पादन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातून इंडियन शुगर, तसेच अनेक बड्या कारखान्यांची साखर बाजारपेठेत दाखल झाली आहे. 

यंदा दुष्काळामुळे डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.घटल्याने डाळींचा साठा करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसून येत असल्याने खरेदीत तेजी आली आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत डाळींच्या भावामध्ये तेजी अपेक्षित असल्याचे बोलले जाते. सरकारकडे असलेल्या डाळीच्या साठ्याची दोन वर्षाची मर्यादा आता संपत चालल्याने डाळींचा दर्जा घसरत आहे, त्यामुळे ही डाळ आता गोदामातून कशी बाहेर काढता येईल या विचारात शासकीय यंत्रणा असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी एक हजार तीनशे रुपयांवरूनथेट दोन हजार चारशेरुपयांवर पोहोचली आहे.

जालना जिल्हा मोसंबीचे आगर म्हणून ओळखल्या जाते. सध्या चांगल्या मोसंबीला २० हजार ते २६ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. तर मध्यम स्वरुपाच्या मालाला १५ ते २० हजार रुपये टन भाव मिळत आहे. दिल्ली, राजस्थान, कोलकाता या भागातही मोसंबीला मागणी असल्याची माहिती मोसंबी अडत असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार