शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके सुकली; अस्वस्थ शेतकऱ्याने २५ एकर सोयाबीन पिकावर फिरवले रोटाव्हिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 19:10 IST

Rain Delay : विहीर कोरडीठाक पडल्याने सोयाबीनला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

ठळक मुद्देपावसाने उघडीप दिल्याने सध्या पिके सुकून चालली आहे. शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट उभे राहिले आहे.

- हुसेन पठाणआन्वा (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे पावसाअभावी सुकून चाललेल्या २५ एकरातील सोयाबीन पिकावर शेतकऱ्याने मंगळवारी रोटाव्हिटर फिरवून पीक उद्ध्वस्त केले आहे.

आन्वा पाडा शिवारात जूनच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केली. येथील बबन देशमुख यांनी आन्वा पाडा शिवारातील गट नंबर ३८२ मध्ये २५ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पीकही चांगले आले. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पीक सुकू लागले. विहीर कोरडीठाक पडल्याने सोयाबीनला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. चातकासारखी ते पावसाची वाट पाहत होते. परंतु, महिना उटलूनही पाऊस न पडल्याने सोयाबीनच्या पिकाने माना टाकल्या. शेवटी मंगळवारी त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने २५ एकरातील सोयाबीन पिकावर रोटव्हिटर फिरवले.

आन्वा परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आन्वा, आन्वा पाडा, कोदा, कारलावाडी, जानेफळ गायकवाड, वाकडी, कोकडी आदी भागांतील शेतकऱ्यांनी बॅंकेडून पीककर्ज घेऊन बी-बियाणे खरेदी केले. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सध्या पिके सुकून चालली आहे. शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट उभे राहिले आहे.

अडीच लाख रुपयांचा खर्चबबन देशमुख यांना २५ एकर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च आला होता. यात बी-बियाणे, खते व पेरणीसाठी लागलेल्या खर्चाचा समावेश आहे. त्यांनी एका बॅंकेकडून पीककर्ज काढून बी-बियाणे व खत खरेदी केले होते. आता हा खर्च कसा काढावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच मी २५ एकरात सोयाबीन पेरली. त्यानंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पीकही चांगले आले होते. परंतु, गेल्या २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकाने माना टाकल्या आहे. त्यामुळे रोटव्हिटर फिरवून सोयाबीनचे पीक काढून टाकले.- बबन देशमुख, शेतकरी, आन्वा पाडा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालनाRainपाऊस