शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

भरीव नुकसान भरपाईसाठी शिवसेनेने केली निदर्शने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:44 AM

विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, फळबागांसाठी ५० हजार रूपये अनुदान द्यावेत आदी विविध मागण्यांसाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद आदी खरीप पिकांसह फळबागा उध्दवस्त झाल्या. अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या. जिल्ह्यातील ६ लाख १५ हजार १६५ हेक्टर पेरणीखालील क्षेत्र आहे. पैकी सोयाबीनचे १ लाख २५ हजार ९६७ हेक्टर, कापूस २५ हजार हेक्टर, मका ४८ हजार ८१५ हेक्टर, बाजरी ७ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावर आहे. पैकी जवळपास ४ लाख ६५ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील ८१ हजार २१६ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.शासनाने नुकसानीपोटी जाहीर केलेली मदत तोकडी आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रूपये तर फळबागांना हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, गोदावरी खोरे विकास ममहामंडळाचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, अ‍ॅड. भास्कर मगरे, पांडुरंग डोंगरे, महिला प्रमुख सविता किवंडे, संतोष मोहिते, दिपक रणनवरे, विष्णू पाचफुले, बबनराव खरात, हरिहर शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.कर्जवसुली तात्काळ थांबवासततचा दुष्काळ आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी अनेक संकटात आहेत. शेतक-यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र