शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

शेतकऱ्यांसह बियाणे बाजाराच्या नजरा ढगांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:34 AM

दुष्काळाने हैराण झालेल्या बळीराजाला मृग नक्षत्रात पावसाच्या सरी बरसून मनाला दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने हैराण झालेल्या बळीराजाला मृग नक्षत्रात पावसाच्या सरी बरसून मनाला दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. मृग नक्षत्राचे संपूर्ण १५ दिवस कोरडे गेल्याने शेतक-यासह बियाणे बाजाराच्या नजरा या आकाशाकडे लागून आहेत. कोट्यवघी रूपयांच्या बियाणांचा साठा शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत असून, संयुक्त आणि मिश्र तसेच रायायनिक खतांचा जवळपास ६५ हजार मेट्रिक टन साठा विक्रीविना पडून आहे.जालना जिल्ह्यात जवळपास पाच लाख ८० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. सध्या केवळ भोकरदन आणि परतूर तालुक्यात शंभर ते दीडशे शेतकºयांनी पेरणी केल्याचे सांगण्यात आले.बीटी बियाणांच्या वेगवेगळ्या पाच ते सात कंपन्यांच्या बीटी बियाणांची जवळपास आठ लाख २५ हजारांपेक्षा जास्त पाकिटे बाजारात दाखल झाली आहेत. पूर्वी बियाणांची टंचाई निर्माण होत होती, ती आता इतिहासजमा झाली आहे. पावसाने यंदा मोठी हुलकावणी दिल्याने मुगाच्या पेरणीवर यांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे असले तरी जालना जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाचा विचार केल्यास आषाढी एकादशीनंतरच पेरणी झाल्याचे दिसून येते. मुगाचे उत्पादन हे सरासरी ८० दिवसांमध्ये निघते. त्यामुळे पोळा सणाला नवीन मूग बाजारपेठेत येतो, परंतु यंदा तशी चिन्हे धूसर दिसत आहेत.जालना ही बियाणांची राजधानी म्हणून ओळखली जाते. यंदा स्थानिक बियाणे कंपन्यासह आंध्र प्रदेशातील बीटी बियाणे कंपन्यांनी चांगलेच हातपाय रोवले आहेत. यंदा बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी आठ भरारी पथके नियुक्त केली आहेत, असे असताना अद्याप या पथकांना कुठलेच काम नाही. पाऊस लांबल्याने एकूणच जालन्यातील बाजारपेठेत मरगळ आल्याचे चित्र आहे.किरकोळ स्वरूपाचे शेती उपयोगी साहित्य खरेदी करतांना शेतकरी दिसत आहे. यंदा अद्यापही पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारे प्लास्टिकची पन्नी विक्रीही पाहिजे तशी झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. एकूणच जालन्यासह तालुका पातळीवरील बाजारपेठेत पूर्वी प्रमाणे उत्साह दिसून येत नाही.२२ जूनपासून पावसाचा अंदाजवायू चक्री वादळाने यंदा पाऊस लांबवल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. येत्या तीन दिवसांत चांगल्या पावसास प्रारंभ होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात ख-या अर्थाने खरिपाच्या पेरणीस प्रारंभ होणार आहे.या संदर्भात कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राकडून शेतक-यांना पेरणीची घाई न करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. २० जून उजाडला असला तरी प्रचंड उकाड्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळMonsoon Specialमानसून स्पेशलagricultureशेतीRainपाऊस