शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत १४५४ अर्जांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:17 IST

अंबड : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी चांगलीच पेटली आहे. आजवर तब्बल १४५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जात ...

अंबड : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी चांगलीच पेटली आहे. आजवर तब्बल १४५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठीही इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे.

अंबड तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींतील २३४ प्रभागांतून ६२७ सदस्य निवडले जाणार आहेत. गत चार दिवसांत संबंधित गावांतील इच्छुकांनी १४५४ अर्ज विकत घेतले आहेत. ग्रामपंचायतीमधील मागासवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये अंशत: बदल करण्यात आलेला आहे. आता संबंधित मागासवर्गीय अर्जदारांनी सर्वप्रथम त्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने वेबपोर्टलवर भरून त्यासोबत आवश्यक पुरावे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर ऑनलाइन अर्जाची प्रिंट घेऊन सदर हार्डकॉपी व इतर आवश्यक पुरावे पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपद्धतीने तहसील कार्यालयामार्फत समिती कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.

तालुक्यात होत असलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विद्यमान पालकमंत्री राजेश टोपे यांचे पाथरवाला व माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचे शहागड यासह विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्षांचे होमटाऊन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या गावांतील निवडणुका होत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे. विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, गावपातळीवरील सत्ता केंद्र आपल्याच गटाच्या ताब्यात असावे, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

निवडणुकांचा मोठा टप्पा

तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हा टप्पा होत आहे. त्यामुळे सत्ता केंद्र आपल्याच ताब्यात राहावी, यादृष्टीने राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चेबांधणी करीत आहेत. तसेच गावागावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. विशेषत: बंडखोरी होणार नाही, याची सर्वाधिक दक्षता प्रमुख पक्षांचे पदाधिकारी स्वत: घेताना दिसत आहेत.