शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 14:24 IST

 जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून सुरू होते विशेष प्रयत्न

जालना : पेपरलेस कार्यालय करण्यासाठी महसूल विभागाने जमावबंदी खात्याच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यांचे डिजिटायजेशन करण्यासह आॅनलाईन फेरफार करणे या उपक्रमात जालना जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 

महसूल विभागाकडून शेतजमिनी आणि नामांतर तसेच मृत्यूमुखी पडल्यानंतर वारसाचा फेर घेणे आदी कामांमध्ये मोठा वेळ खर्ची होत होता. त्याचप्रमाणे जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर संबंधित खरेदी-विक्रीदारांच्या हिश्यांची नोंद घेतानाही अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता या अडचणी जिल्ह्यात दूर झाल्या आहेत. फेर घेणे आणि सातबारा उतारा मागण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या घरी अथवा कार्यालयामध्ये येण्याची गरज उरलेली नाही.  जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

गत काही वर्षात शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता सेतू सुविधा केंद्र आणि अन्य आॅनलाईन सुविधेच्या माध्यमातून ९ लाख १८ हजार २१० सातबाराच्या प्रती काढल्याची नोंद आहे. या सातबारा संगणकीकरणामुळे शेतकऱ्यांमधील होणारा वाददेखील कमी झाला आहे. फेर घेण्यासाठी जो कालावधी जात होता तोदेखील वाचला आहे. जवळपास २ लाख ४३ हजार ८२४ जणांचे आॅनलाईन फेरफार झाले असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. हे संगणीकरण करण्यासाठी एनआयसी विभागाची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले. 

अन्य माध्यमातून ऑनलाईन सेवा देणारमहसूल विभागाने एकूणच संपूर्ण राज्यात पेपरलेस कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना कमीत कमी शासकीय कार्यालयात येण्याची गरज पडेल, अशी पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील सेतू सुविधा केंद्र, तसेच अन्य माध्यमांतून ऑनलाईन सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे सुरू आहे, असे जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalanaजालनाState Governmentराज्य सरकार