शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 14:24 IST

 जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून सुरू होते विशेष प्रयत्न

जालना : पेपरलेस कार्यालय करण्यासाठी महसूल विभागाने जमावबंदी खात्याच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यांचे डिजिटायजेशन करण्यासह आॅनलाईन फेरफार करणे या उपक्रमात जालना जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 

महसूल विभागाकडून शेतजमिनी आणि नामांतर तसेच मृत्यूमुखी पडल्यानंतर वारसाचा फेर घेणे आदी कामांमध्ये मोठा वेळ खर्ची होत होता. त्याचप्रमाणे जमिनीची खरेदी-विक्री झाल्यानंतर संबंधित खरेदी-विक्रीदारांच्या हिश्यांची नोंद घेतानाही अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता या अडचणी जिल्ह्यात दूर झाल्या आहेत. फेर घेणे आणि सातबारा उतारा मागण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या घरी अथवा कार्यालयामध्ये येण्याची गरज उरलेली नाही.  जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत.

गत काही वर्षात शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता सेतू सुविधा केंद्र आणि अन्य आॅनलाईन सुविधेच्या माध्यमातून ९ लाख १८ हजार २१० सातबाराच्या प्रती काढल्याची नोंद आहे. या सातबारा संगणकीकरणामुळे शेतकऱ्यांमधील होणारा वाददेखील कमी झाला आहे. फेर घेण्यासाठी जो कालावधी जात होता तोदेखील वाचला आहे. जवळपास २ लाख ४३ हजार ८२४ जणांचे आॅनलाईन फेरफार झाले असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. हे संगणीकरण करण्यासाठी एनआयसी विभागाची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले. 

अन्य माध्यमातून ऑनलाईन सेवा देणारमहसूल विभागाने एकूणच संपूर्ण राज्यात पेपरलेस कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना कमीत कमी शासकीय कार्यालयात येण्याची गरज पडेल, अशी पावले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील सेतू सुविधा केंद्र, तसेच अन्य माध्यमांतून ऑनलाईन सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे सुरू आहे, असे जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalanaजालनाState Governmentराज्य सरकार