शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:44 AM

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कमी असला तरी गत दोन दिवसांत वीज पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ५.८६ मिमी पाऊस झाला.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जालना महसूल मंडळात १० मिमी, जालना ग्रामीण ६ मिमी, रामनगर, विरेगाव, पाचन वडगावमध्ये २ मिमी, तर सेवली ४ मिमी व वाघ्रूळ जहागीर मंडळात ६ मिमी पावसाची नोंद झाली.बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी महसूल मंडळात ४० तर दाभाडी मंडळात ६ मिमी पाऊस झाला. भोकरदन मध्ये २ मिमी, धावडा २३ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ५ मिमी, हसनाबाद २ मिमी, राजूर ५ मिमी तर केदारखेडा शिवारात ७ मिमी पाऊस झाला आहे. परतूर महसूल मंडळात १५.८० मिमी पाऊस झाला. मंठा, ढोकसल ५ मिमी तर पांगरी गोसावीत ८ मिमी पाऊस झाला. अंबड २ मिमी, धनगर पिंपरी ७ मिमी, जामखेड २६ मिमी, वडीगोद्री १५ मिमी, गोंदी ७ मिमी, रोहिलागड २२ मिमी पाऊस झाला. घनसावंगीत ७ मिमी, रांजणी १५ मिमी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव ५ मिमी, अंतरवली टेम्बी २३ मिमी तर जांभ समर्थ येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.१७ मंडळे कोरडीजिल्ह्यातील ३९ पैकी १७ महसूल मंडळांत पाऊस झाला नाही. यात बदनापूर तालुक्यातील बदनापूर, रोषणगाव, सेलगाव, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार, अन्वा, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, टेंभुर्णी, कुंभारझरी, वरूड, माहोरा, परतूर तालुक्यात सातोना, आष्टी, श्रीष्टी, वाटूर, मंठा तालुक्यातील तळणी, अंबड तालुक्यातील सुखापुरी तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव महसूल मंडळात पाऊस झाला नाही.रामनगर : वीज पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यूरामनगर : जालना तालुक्यातील दहिफळ (काळे) या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता दुसरीत शिकत असलेला महेश गणेश राऊत (९) दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर आला. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या जुना टॉवरजवळ तो खेळत असताना अचानक वीज अंगावर पडली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.दानापूर शिवारात लिंबाच्या झाडावर पडली वीजदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर शिवारात मनसुबराव औचितराव पवार यांच्या वखारीवर लिंबाचे झाड आहे. या झाडावर सोमवारी दुपारी वीज पडल्याने झाड जळाले. पाऊस सुरू झाल्याने मनसुबराव पवार, चंद्रकला पवार, ज्ञानेश्वर पवार, दत्ता पवार, सोनू पवार, संदीप पवार, रामेश्वर पवार यांनी वखारीवर प्रवेश केला.तर दत्ता पवार हा पाणी पिण्यासाठी लिंबाच्या झाडा जवळील हौदावर गेला होता.तो पाणी पिऊन परत आला. त्यानंतर काही क्षणातच लिंबाच्या झाडावरती वीज पडली. वेळेवर वखारीवर गेल्याने आम्ही बचावल्याचे मनसुबराव पवार यांनी सांगितले. दरम्यान, पडसखेडा मुर्तड येथेही पावसामुळे कपाशी, मका, मिरची इ. पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सुभेदार चौधरी, विश्वनाथ वरपे यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरDeathमृत्यू