शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे ३.२२ कोटी लिटर पाण्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:37 IST

यावर्षी जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्ंिटग उपक्रम राबविण्यात आला

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सततची दुष्काळी परिस्थिती, पाण्यासाठी होणारी भटकंती, पाण्यासाठी अनेकांनी गमवलेले जीव या सर्व बाबी डोळ््यासमोर ठेवून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्ंिटग उपक्रम राबविण्यात आला. यात शासकीय व वैयक्तिक अशा ३९२ जणांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे जवळपास ३.२२ करोड लिटर पाण्याची बचत झाली असून, यातून १२ हजार लिटर क्षमतेचे २ हजार ६८१ टँकर भरू शकतात. दुष्काळ मुक्तीसाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांनी या उपक्रमाचा आदर्श घेण्याची गरज आहे.झाडांच्या कमतरतेमुळे दरवर्षी मराठवाड्यात पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मराठवाड्याची वाटचाल वाळवंटी प्रदेशाकडे होत आहे. मागील काही वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. गतवर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात जवळपास ६०० ते ७०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. जालना जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.जिल्हा टॅँकरमुक्त करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत - जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यामुळे जवळपास जिल्हाभरातील ३९२ जणांनी या स्पर्धेत भाग घेतला.त्यातच यावर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने याचा फायदा रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपक्रमाला झाला. ज्या बोअर, विहिरी कोरड्याठाक पडल्या होत्या. त्या बोअर व विहिरींच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तर काही ठिकाणच्या बोअरमधून पाणी बाहेर पडत आहे. या उपक्रमामुळे जवळपास ३.२२ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरले असून, १२ हजार लिटर क्षमतेचे २ हजार ६८१ टॅकर या पाण्यातून भरू शकतात. त्यामुळे टँकरवर खर्च होणाऱ्या १.३४ करोड रूपयांची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवकर, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ श्रीकांत चित्राल, नम्रता गोस्वामी, जय राठोड, भगवान तायड, संजय डोंगरदिवे, हिमांशू कुलकर्णी, ऋषिकेश जोशी यांनी परिश्रम घेतले.यावर्षी जिल्ह्यातील ३९२ जणांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. याबाबत जनजागृती देखील करण्यात आली. पुढील वर्षीही जिल्हाभरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. दरम्यान, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रत्येक गावाकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया स्त्रोतावर अवलंबून राहावे लागते. भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासाठी शासनातर्फे काही प्रमाणात उपाय -योजना करण्यात येतात. परंतु, जिल्ह्याची परिस्थिती पाहता त्या योजना अपुºया पडत होत्या. जुन महिन्याअखेर जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के ग्रामीण भाग हा टँकरवर अवलंबून होता. ही बाब ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा यांनी जिल्ह्यात रेन वॉटर हॉर्वेस्टिंग उपक्रम राबविण्याचे ठरवले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRainपाऊसWaterपाणीSocialसामाजिक