शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

मृतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : जालना जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर गत दोन वर्षांत २६ अपघातांची नोंद असून, यात २६ जणांचा मृत्यू झाला ...

जालना : जालना जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर गत दोन वर्षांत २६ अपघातांची नोंद असून, यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातासह रेल्वेसमोर येऊन आत्महत्या करणाऱ्यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. विशेषत: बेवारस मयतांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांची दमछाक होत असून, इतर ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची या कामी मदत घेतली जात आहे.

रेल्वेस्थानकावर कायदा- सुव्यवस्था राहावी, रेल्वे अपघातानंतर जखमींना मदत मिळावी, यासाठी रेल्वे पोलिसांची टीम काम करते. जालना येथील रेल्वेस्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवासी, एक्स्प्रेस रेल्वेंची संख्या मोठी आहे. रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. जिल्हा हद्दीतील ग्रामीण मार्गावर गरजेनुसार फाटक तयार करण्यात आले असून, याठिकाणीही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत; परंतु अनेक जण रेल्वे येत असतानाही अचानक रेल्वेसमोर येत असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू होतो, तर अनेक जण रेल्वेखाली येऊन आत्महत्या करत आहेत. विशेषत: अनेकांचे मृतदेह रेल्वेपटरीच्या बाजूला बेवारस पडल्याचेही दिसून येते. गत दोन वर्षांतील रेल्वे पोलिसांकडे नोंद असलेल्या जवळपास २६ प्रकरणांमध्ये १६ मयतांची ओळख पटविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

रेल्वे अपघात झाल्यानंतर संबंधित जखमींना शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. शिवाय रेल्वे अपघात होऊ नयेत, यासाठीही रेल्वे पोलीस दलाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते; परंतु मानसिक आजाराला बळी पडलेले बहुतांश नागरिक रेल्वेखाली येऊन आत्महत्या करीत असल्याचेही दिसून येते.

१० मृतदेहांची ओळख पटली नाही

गत दोन वर्षांत अपघातातील मयतांपैकी १६ जणांची ओळख रेल्वे पोलिसांना पटली आहे, तर जवळपास १० जणांची ओळख पटलेली नाही.

बेवारस मयतांची ओळख पटली नाही, तर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला पत्र दिले जाते. नगरपालिका प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जातात.

रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. एखाद्याची ओळख पटत नसेल, तर इतर पोलीस ठाण्यांना माहिती देऊन मयताची ओळख पटविण्यासाठीही आम्ही सतत प्रयत्न करीत असतो.

-रवी देशमुख, पाेउपनि. रेल्वे पोलीस

२०१९

रेल्वे अपघात ७

मृत्यू ७

२०२०

रेल्वे अपघात १९

मृत्यू १९