शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी पहाटे चारपासून शेतकऱ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

शेषराव वायाळ परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क ...

शेषराव वायाळ

परतूर : खरिपातील हातचे गेलेले पीक, उसनवारी करून केलेली रब्बी पिकांची पेरणी आणि आता पीककर्ज घेण्यासाठी चक्क पहाटे चार वाजल्यापासून बँकेच्या दारात उभे राहण्याची आलेली वेळ... ही व्यथा आहे, परतूर व परिसरातील शेतकऱ्यांची! त्यामुळे ‘उध्दवा, अजब तुझे सरकार...’ असे म्हणण्याची वेळ कडाक्याच्या थंडीत रांगेत उभे राहिलेल्या शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतकऱ्यांच्या नशिबी आस्मानी- सुल्तानी संकटे पूजलेली! यंदा खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, नंतर अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी पडले. खरिपातील उत्पन्न सोडाच पण केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र, अद्यापही असंख्य शेतकऱ्यांच्या हातात ही रक्क्म आलेली नाही. त्यामुळे परतूर परिसरातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून, सावकारी कर्ज काढून रब्बीतील पिकांची पेरणी केली.

पीककर्ज मिळावे यासाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले. बँकेत चकरा मारूनही अद्याप अनेकांना कर्ज मिळाले नाही. कर्ज सोडा पण, बँकेत प्रवेश मिळणेही मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरी चक्क कडाक्याच्या थंडीत पहाटे ४ वाजताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परतूर शाखेसमोर रांगा लावू लागले आहेत. त्याला कारण म्हणजे बँकेने तडजोड करणे व नवीन पीककर्ज देण्यासाठीची वेळ सकाळी १० ते २ केली आहे. परिणामी आपला नंबर लवकर लागावा म्हणून हे शेतकरी बँकेसमोर रांगा लावत आहेत. एकरकमी तडजोड केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज देण्यात येईल असेही अश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे पीककर्ज देऊन केलेली उसनवारी, सावकारी कर्ज फेडता येईल, अशी आशा या शेतकऱ्यांना आहे. पहाटेच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत रांगेत थांबलेले शेतकरी मात्र, उध्दवा अजब तुझे सरकार... असे म्हणत बँक प्रशासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेबाबत संताप व्यक्त करीत आहेत.

चौकट

कचऱ्यापासून पेटविल्या जातायेत शेकोट्या

पीककर्जासाठी पहाटे ४ पासून शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे बँक परिसरात पडलेला कचरा गोळा करून शेकोट्या पेटविल्या जात आहेत. या शेकोटीची उब पहाटेच्या सुमारास शेतकऱ्यांना आधार देत आहे. मात्र, पहाटेची थंडी अंगावर झेलूनही पीककर्ज मिळेल की नाही ? अशी चिंता या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

रात्रीपर्यंत बँकेचे व्यवहार

बँकेची एकरकमी तडजोड योजना सुरू आहे. शेतकरी सध्या पहाटेच येऊन रांगा लावत आहेत. ही कामे करून आम्हाला दैनंदिन कामे, व्यवहार रात्रीपर्यंत पहावे लागतात.

महेंद्र डोंगरे

शाखा व्यवस्थापक