शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कार्यमुक्त १०५ कर्मचाऱ्यांचा प्रश्न आरोग्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त असलेल्या आणि कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना ...

जालना : कोणतीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त असलेल्या आणि कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्त करण्यात आले आहे. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रिक्त जागांवरील नियुक्तीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत शुक्रवारी कोविड नर्सिंगच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे.

कोरोनाबाधितांना आप्तेष्टांनी दूर केले. परंतु, कोविड रूग्णालयात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती मिळालेली असतानाही या १०५ कर्मचाऱ्यांनी सेवानिष्ठेने त्यांची सेवा केली. कोरोनाचे रूग्ण कमी झाले असले तरी त्याचा फैलाव जिल्ह्यात कायम आहे. परंतु, राष्ट्रीय अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक कार्यमुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोविड रूग्णालयात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाने या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचित केले होते. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.

पालकमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत हा विषय गेला होता. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व कोविड नर्सिंग कर्मचारी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या शिष्टमंडळात सकारात्मक निर्णय झाला तरच या १०५ जणांवर उपासमारीची, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार नाही.

बैठकीतील चर्चेकडे कर्मचारी कुटुंबीयांचेही लक्ष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना बाधितांची एक दोन नव्हे तब्ब्ल १०५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा केली आहे. कोरोनासारख्या महामारीत प्रारंभी कोणी घराबाहेर पडत नव्हते. त्या काळात बाधितांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात या कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे शुक्रवारी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे संबंधित कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.