शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली ...

जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणेसहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे.

गतवर्षी कोरोनामुळे सीसीआयमार्फत सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र बंद पडले होते. परराज्यातील अनेक मजूर गावी निघून गेल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्णकरण्यास मोठा विलंब झाला होता. यंदा मात्र, सीसीआयच्या वतीने जिल्ह्यात वेळेवर कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. यामध्ये जालना येथील केंद्रावर ४००५ शेतकऱ्यांचा एक लाख २ हजार ४३८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. बदनापूर येथील केंद्रावर १६५७ शेतकऱ्यांचा ५४ हजार ३३५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. परतूर येथील केंद्रावर ३७०५ शेतकऱ्यांचा ९४ हजार ४५९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मंठा येथील केंद्रावर २१६५ शेतकऱ्यांचा ५२ हजार ७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. भोकरदन येथील केंद्रावर २५४० शेतकऱ्यांचा ८६ हजार ६६३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. राजूर येथील केंद्रावर ११५५ शेतकऱ्यांचा ३९ हजार ३३६ क्विंटल, कुंभार पिंपळगाव येथील केंद्रावर २३४५ शेतकऱ्यांचा ६२ हजार ७६ क्विंटल तर शहागड येथील केंद्रावर ३४८० शेतकऱ्यांचा ८४ हजार ६८७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

खाजगी व्यापाऱ्यांकडे २२ हजार क्विंटल

जिल्ह्यातील खाजगी व्यापाऱ्यांनी २२ हजार ५९ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यात परतूरमध्ये ३८०० क्विंटल, मंठ्यात ८ हजार ५५० क्विंटल, भोकरदनमध्ये ४ हजार ५०९ क्विंटल, कुंभार पिपंळगाव येथे ३१०० क्विंटल, तर शहागड येथील व्यापाऱ्यांनी २१०० क्विंटल कापसाची खरेदी कली आहे.

केंद्रावर वाहनांच्या रांगा

सध्या सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कापूस खरेदीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना दोन- तीन दिवस केंद्रावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.