शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

४० हजार संकल्प पत्राद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:36 IST

शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून ४० हजार ‘संकल्प पत्र’ जालना तालुक्यातील १७ केंद्रांसह शहरातील शाळांंमधून शुक्रवारपासून भरुन घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत निवडणूक आयोगाचे या निवडणुकीचे ब्रीदवाक्य सुलभ निवडणुका असून सोबतच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी शहरासह खेड्यापाड्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विविध प्रकारे जनजागृती स्वीप उपक्रमांतर्गंत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून ४० हजार ‘संकल्प पत्र’ जालना तालुक्यातील १७ केंद्रांसह शहरातील शाळांंमधून शुक्रवारपासून भरुन घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तथा तालुका स्वीप नोडल अधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील संकल्प पत्र जालना तालुक्यातील मुलांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविले जात असून या पत्रात विद्यार्थांची व पालकांची सविस्तर माहिती विचारण्यात आली आहे. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत धर्म, जात, वंश व भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचा व लोकशाही बळकटीकरणाचा संकल्प करत आहोत, असा संदेश घराघरात पोहोचविला जातोय.दरम्यान, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील मुलांकडून हे पत्र भरुन घेतल्या जात आहे. तरी पालकांनी हे पत्र भरुन आपल्या पाल्याकडे द्यावे, असे आवाहन ही निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.यावेळी पुढे बोलतांना खरात म्हणाले की, १ एप्रिलपर्यंत सर्व संकल्प पत्र भरुन परत घेतले जाणार असून, नंतर ते तालुका स्वीप कक्षात ठेवले जातील असे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकStudentविद्यार्थीSocialसामाजिक