शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फळबागा लागवड करा, कृषी विभागाचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:08 AM

फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालय जाफराबाद यांनी यावर्षी १०४ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालय जाफराबाद यांनी यावर्षी १०४ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या करिता जवळपास १०६ लाभार्थ्यांची निवड करून त्यांना फळबाग लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्यासाठीच पाणी नाही तर फळबागा कशा जगवायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी शासन तीन टप्प्यांत अनुदान देणार आहे. त्यानुसार तालुका कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवड करण्यास इच्छुक असलेल्या शेतक-यांकडून जून महिन्यात आॅनलाईन अर्ज मागवले होते. ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून पात्र शेतक-यांना मार्चअखेर फळबाग लागवड करण्याचे आदेशही दिले आहेत.मार्च महिन्यापर्यंत फळबाग लागवड न केल्यास निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची मुदत रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी वेळेत मिळत नाही, फळबागाची लागवड कशी करायची, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे.या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. तालुक्यात एकूण १०४.६ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या करिता टप्प्या-टप्प्याने सूक्ष्मसिंचन, कलमे, खड्डे खोदकाम करून रोपे लावून याचा अहवाल कृषी अधिकारी कार्यालयाला मार्च अखेरपर्यंत द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना