शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 09:35 IST

शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. नवी मुंबईतील वाशी येथे सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा कराव, तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्या द्यावा, अशी मागणी करत ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळेच, सरकारी अधिकारी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जरांगे यांनी कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा अन् मगच माझ्याकडे या, अशी भूमिका घेतली आहे. 

शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. १५ तारखेचे अधिवेशन २० पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी राजकारण्यांना नीच असा शब्द वापरला आहे. याचबरोबर उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणीही केली आहे. यावेळी, त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांना इथून निघून जाण्याचं सांगितलं. 

जरांगे यांची समजूत घालण्यासाठी अधिकारी आले होते तेव्हा, काय आणलंय, काय नाही ते बघायचं तरी, असे म्हणत अधिकाऱ्याने आपली भूमिका मांडली. ३१ जानेवारी २०२४ पर्यंतचे शासकीय, राजकीय गुन्हे माघारी घेण्याच्या अध्यादेश कमिटीला त्यांनी मुदतवाढ दिलीय. तुमची कालपर्यंतची जी मागणीय ती दिली ना त्यांनी, कमिश्नरही इथं आले आहेत, असे संबंधित अधिकारी म्हणताना व्हडिओत दिसून येत आहे. त्यावर, जरांगे संतापले असून, तुमचं सरकारपाशी वजन बसावं म्हणून मोठेपण सांगताय का, गुन्हे मागे घेतले का ते सांगा?, असा सवाल जरांगे यांनी विचारल. त्यानंतर, यात सरळ सरळ लिहिलंय की गुन्हे मागे घेतले जातील, असे अधिकारी म्हणत आहेत. त्यावर, घेतले जातील, का घेतले आहेत?, असा प्रतिप्रश्न जरांगे यांनी केला आहे. शेण खातो का मी, उठा इथून... अरे उठा इथून, फसवताय का मराठ्याला, असे म्हणत मनोज जरांगे त्यांना समजावण्यास आलेल्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. 

संबंधित अधिकारी तेथून निघून गेल्याचंही व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्यानंतर, आणखी एक सहकारी त्यांना समजवून सांगत होते. त्यावेळी, माझं डोकं दुखायलंय, व्हा तिकडं. आलात १५ दिवसांतून आणि मला तुकाराम महाराजांसारखं ज्ञान शिकवताय, असे म्हणतही जरांगे यांनी त्यांची समजूत घालणाऱ्याला फटकारलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावरून जरांगे यांनी माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिल का असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल असे म्हटले. दरम्यान, आज मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मराठा बांधवांकडून शासकीय कार्यालयात निवेदनही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना