शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 09:35 IST

शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. नवी मुंबईतील वाशी येथे सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा कराव, तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्या द्यावा, अशी मागणी करत ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळेच, सरकारी अधिकारी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जरांगे यांनी कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा अन् मगच माझ्याकडे या, अशी भूमिका घेतली आहे. 

शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. १५ तारखेचे अधिवेशन २० पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी राजकारण्यांना नीच असा शब्द वापरला आहे. याचबरोबर उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणीही केली आहे. यावेळी, त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांना इथून निघून जाण्याचं सांगितलं. 

जरांगे यांची समजूत घालण्यासाठी अधिकारी आले होते तेव्हा, काय आणलंय, काय नाही ते बघायचं तरी, असे म्हणत अधिकाऱ्याने आपली भूमिका मांडली. ३१ जानेवारी २०२४ पर्यंतचे शासकीय, राजकीय गुन्हे माघारी घेण्याच्या अध्यादेश कमिटीला त्यांनी मुदतवाढ दिलीय. तुमची कालपर्यंतची जी मागणीय ती दिली ना त्यांनी, कमिश्नरही इथं आले आहेत, असे संबंधित अधिकारी म्हणताना व्हडिओत दिसून येत आहे. त्यावर, जरांगे संतापले असून, तुमचं सरकारपाशी वजन बसावं म्हणून मोठेपण सांगताय का, गुन्हे मागे घेतले का ते सांगा?, असा सवाल जरांगे यांनी विचारल. त्यानंतर, यात सरळ सरळ लिहिलंय की गुन्हे मागे घेतले जातील, असे अधिकारी म्हणत आहेत. त्यावर, घेतले जातील, का घेतले आहेत?, असा प्रतिप्रश्न जरांगे यांनी केला आहे. शेण खातो का मी, उठा इथून... अरे उठा इथून, फसवताय का मराठ्याला, असे म्हणत मनोज जरांगे त्यांना समजावण्यास आलेल्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. 

संबंधित अधिकारी तेथून निघून गेल्याचंही व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्यानंतर, आणखी एक सहकारी त्यांना समजवून सांगत होते. त्यावेळी, माझं डोकं दुखायलंय, व्हा तिकडं. आलात १५ दिवसांतून आणि मला तुकाराम महाराजांसारखं ज्ञान शिकवताय, असे म्हणतही जरांगे यांनी त्यांची समजूत घालणाऱ्याला फटकारलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावरून जरांगे यांनी माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिल का असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल असे म्हटले. दरम्यान, आज मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मराठा बांधवांकडून शासकीय कार्यालयात निवेदनही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना