शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज- भास्करराव अंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST

जुना जालना भागातील वैष्णवी व्यापारी संकुलात शुक्रवारी सकाळी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश ...

जुना जालना भागातील वैष्णवी व्यापारी संकुलात शुक्रवारी सकाळी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अंबेकर बोलत होते. या कार्यक्रमास दलितमित्र बाबुराव सतकर, ॲड. शिवाजी आदमाने, ॲड. अशोक तारडे, उद्योजक मनोहर सिनगारे, पांडुरंग क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, अब्दुल बासेद कुरेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अंबेकर म्हणाले, देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र या संख्येच्या तुलनेत आर्थिक तरतूद अत्यंत नगण्य केली जाते. आर्थिक तरतूद कमी केली जात असल्यामुळे ओबीसी समाजाच्या विकासाच्या वाटा खुंटल्या आहेत. या प्रवर्गाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर सरकारने देशभरातील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे काम तातडीने हाती घेण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी आ. राजेश राठोड म्हणाले, ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्याचे काम करू. येत्या २४ जानेवारी रोजी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाल मोर्चात जिल्हाभरातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन आ. राठोड यांनी केले.

तत्पूर्वी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या मोर्चाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. प्रास्ताविक ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. सूत्रयंचालन कपिल दहेकर यांनी तर नगरसेवक अशोक पांगारकर यांनी आभार मानले.