शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST

महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या ...

महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून राजूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिल वसुलीसाठी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, महावितरणने वीज कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. शेतकरी आर्थिक संकटात असून, त्यांची रब्बी हंगामातील पिकांवर मदार आहे. महावितरणने ऐन पिकांना पाणी भरणीच्या हंगामात वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी राजूर उपकेंद्रात सहाय्यक अभियंता गावंडे यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. तसेच वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सहाय्यक अभियंता गावंडे यांनी शेतकऱ्यांनी येत्या चार दिवसांत टप्प्याटप्प्याने थकबाकी भरावी, असे सांगून वीजपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी उपसभापती गजानन नागवे, रावसाहेब भंवर, निवृत्ती शेवाळे, विनोद पुंगळे, कोंडीराम सावंत, अशोक मुटकुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो