शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविताना आईही पाण्यात पडली; मुलाचा मृतदेह आढळला

By विजय मुंडे  | Updated: May 5, 2023 13:54 IST

मायलेकरू बुडाले जायकवाडीच्या डाव्या कालव्यात

वडीगोद्री (जि.जालना) : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईही पाण्यात पडली. या घटनेत पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला. प्रशासकीय शोध मोहिमेत शुक्रवारी सकाळी मुलाचा मृतदेह आढळला असून, रात्री उशिरापर्यंत त्या महिलेचा शोध सुरू होता. ही घटना बुधवारी सायंकाळी दह्याळा (ता.अंबड) शिवारात घडली. सार्थक रवींद्र गारुळे (वय-०९ रा. दह्याळ ता.अंबड) असे मयत मुलाचे नाव आहे. त्याची आई वंदना रवींद्र गारुळे (वय-३५) यांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

दह्याळा येथील वंदना रवींद्र गारुळे ह्या त्यांचा मुलगा सार्थक याला घेऊन बुधवारी सायंकाळी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सार्थक अचानक पाण्यात उतरला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होता. त्याला वाचविण्यासाठी आई वंदना या कालव्यात उतरल्या. परंतु, दोघेही पाण्यात बुडाले. बऱ्याच वेळ होऊनही धुणं धुण्यासाठी गेलेली पत्नी-मुलगा घरी परत आला नाही. त्यामुळे रवींद्र गारुळे हे कालव्याकडे गेले. त्यांना कालव्याच्या वर धुण्यासाठी नेलेले कपडे आणि चपला आढळून आल्या. त्यामुळे माय-लेकरू कालव्यात बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नातेवाइकांना माहिती देऊन शोधमोहीम सुरू केली. मुलगा सार्थक याचा अंतरवाली सराटी शिवारात कालव्याच्या पाण्यात तरंगणारा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. वंदना गारुळे यांचा गुरुवारी रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. मयत मुलाचे शवविच्छेदन वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून अंत्यविधी करण्यात आला. या घटनेची गोंदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, दह्याळा गावावर शोककळा पसरली आहे.

अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेटघटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस स्टेशनचे सपोनि. सुभाष सानप यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन घटनास्थळाला भेट दिली. शिवाय उपस्थित नागरिक, आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांनीही त्या महिलेचा शोध घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, गुरुवारी रात्रीपर्यंत शोधमोहिमेला यश आले नव्हते.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालना