शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सत्ताधारी, विरोधकांकडून मराठा समाजाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:30 AM

शहागड : मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली. परंतु अशोक चव्हाण ...

शहागड : मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली. परंतु अशोक चव्हाण आणि प्रवीण दरेकर हे केवळ एकेकांना प्रश्नोत्तरे करीत राहिले. त्यातून अपेक्षित काही साध्य झालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी, विरोधक केवळ मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील ४४ दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल घेऊन मागण्यांसाठी विधानसभेत चर्चा झाली. राज्य सरकार म्हणते, केंद्रीय कायदामंत्री यांना चर्चाचे निमंत्रण दिले होते आणि विरोधी पक्षनेते म्हणतात निमंत्रण दिलेच नव्हते. सत्ताधारी, विरोधकांची चर्चा पाहता, केवळ मराठा समाजाची दिशाभूल सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाने आता तातडीने श्वेतपत्रिका काढून पाणी का पाणी आणि दूध का दूध करावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. मराठा आरक्षणाबरोबर काही दगा फटका केल्यास उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी माऊली बोचरे, हकिम आतार, राजू ससाणे, दीपक बोचरे, सुदाम जाधव, भागवत तात्या औटे, शरद कटारे, भीमराव औटे, नीलेश बोचरे आदींची उपस्थिती होती.