शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:03 AM

मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. तसेच रात्रीची तिसरी शिप्ट जवळपास बंद केली आहे. याचा परिणाम म्हणून हंगामी कामगारांवर -कॅज्युअल गंडांतर आले आहे. एकूणच २००८ मध्ये मंदी होती, परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील एनआरबी कंपनीला जालन्यातील उद्योग विश्वात मानाचे स्थान आहे. साधारणपणे १८८१ पासून ही कंपनी अविरत सुरू आहे. वाहनांसाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे बेरींग्ज येथे तयार होतात. जवळपास एक हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. परंतु सध्या देशातील आॅटोमाबईल क्षेत्रात आलेली मंदी ही मोठी असल्याचे सांगण्यात आले. वाहन उद्योगातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन लक्षणीयरित्या घटविल्याने आम्हालाही उत्पादन कमी केल्या शिवाय पर्याय नसल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सांगण्यात आले. या कंपनीचे बेरींग्ज हे देशासह परदेशातील अनेक बड्या वाहनांमध्ये वापरले जातात. साधारपणे एका वाहनात आठ ते दहा बेरींग्जचा उपयोग होतो. परंतु आता ही मागणी कमी झाल्याने हंगामी कामगारांना कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले.स्टील उद्योगातील मंदीचे सावट अद्याप हटलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून स्टीलच्या दरात कपातीचा मोठा फटका उद्योजकांना बसलेला आहे.एकीकडे पावसाने देखील पाठ फिरवल्याने स्टीलची मागणी घटली आहे. आता नवरात्रा नंतर यात काही अंशी बदल होईल अशी अपेक्षा उद्योजक ठेवून आहेत. आॅटोमोबाईलशी संदर्भातील दुसरी एक मोठी कंपनी म्हणजेच एल.जी. बालकृष्ण ही असून, या कंपनीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणा-या चैनचे उत्पादन केले जाते. त्या संदर्भात सीटू औरंगाबाद मजदूर युनियनचे ज्येष्ठ कामगार नेते उध्दव भवलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मंदीचा कहर आहे, परंतु तो सध्या जालन्यातील बालकृष्ण कंपनीला अद्यापतरी बसलेला नाही. सध्या त्यांच्याकडे जुन्या आॅर्डर असल्याने उत्पादन जैसे थे असल्याचे भवलकर म्हणाले.आॅर्डर तयार परंतु पैसे थकलेजालन्यातील लघुउद्योगातील अनेक उद्योजकांना देशासह परदेशातून वस्तू निर्मितीच्या आॅर्डर आहेत. त्यानुसार डिझाईन करून उत्पादन तयारही केले आहे. परंतु हे उत्पादन तयार आहे, तुम्ही पैसे देऊन घेऊन जा असा संपर्क वारंवार आॅर्डर देणाऱ्यांकडे करूनही त्यांच्याकडून आता पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे आमची लाखो रूपयांची गुंतवणूक रखडली असून, दिलेल्या आॅर्डर आता कधी डीलेव्हर होतात. याकडेच लक्ष लागून असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीEconomyअर्थव्यवस्थाAutomobile Industryवाहन उद्योग