शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

महावितरणचा चमत्कार; जोडणी नसलेल्यास ४८ हजारांचे बिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:42 AM

अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील एका शेतकऱ्याने नऊ वर्षांपूर्वी कृषीपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. मात्र, अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. असे असले तरी या शेतकºयास वीजवितरण कंपनीने तब्बल ४८ हजार २९० रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. त्यामुळे महावितरणचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.वाढीव मीटर रीडिंग आधारे बिल आकारणे, चुकीचे वीज बिल पाठवणे, बिलच न पाठवणे, वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकाला वारंवार चकरा मारायला लावणे, अशा कारणांमुळे वीज ग्राहकांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे. असाच प्रकार आता दोदडगाव येथील शेतकरी धोंडीराम लहानू पांढरे यांच्यासोबत घडला आहे. पांढरे यांची दोदडगाव गट क्रमांक ७३ मध्ये सव्वा पाच एकर शेती आहे. विहिरीवरील कृषीपंपास वीज जोडणी मिळविण्यासाठी २८ एप्रिल २००९ मध्ये विद्युत विभागाच्या अंबड उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी चार हजार ८०० रुपयाचे कोटेशनही भरले होते. मात्र, नऊ वर्षे प्रतीक्षा करूनही त्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे पांढरे यांनी विहिरीवर डिझेलपंप बसवून शेतीसाठीच्या पाण्याची गरज भागवली. २००९ मध्ये भरलेल्या कोटेशनवर आता वीज जोडणी मिळणार नाही. त्यासाठी नव्याने कोटेशन भरावे लागेल, असे महावितरण कर्मचाºयांनी सांगितल्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांनी पत्नी जिजाबाई पांढरे यांच्या नावाने सहा हजार ३०० रुपयांचे दुसरे कोटेशन भरले. दोन्ही कोटेशन भरल्याच्या पावत्या अधिकाºयांना वारंवार दाखवूनही त्यांना अद्यापही जोडणी मिळालेली नाही. केवळ ४८ हजारांचे वीज बिल देण्यात आल्यामुळे पांढरे यांना धक्का बसला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल