शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

जालन्याला मार्च एन्डचा फटका; ५० कोटीपेक्षा अधिकचा निधी परत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:29 PM

संबंधित अधिका-यांच्या बेजबादारपणामुळे मिळालेला निधी परत गेल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे ४५ कोटी अन्य विभागाचे मिळून अडीच कोटी परत

- संजय देशमुखजालना : राज्य सरकारने आदेश देऊनही जालना जिल्ह्यातील बांधकाम विभाग तसेच नगररचना विभाग, वन विभाग आणि इतर विभागांचा जवळपास ५० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी परत गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित अधिका-यांच्या बेजबादारपणामुळे मिळालेला निधी परत गेल्याचे दिसून येत आहे.

जालना येथील बांधकाम विभाग एक आणि विभाग क्रमांक दोनच्या माध्यमातून विविध रस्ते, पूल तसेच शासकीय इमारतींची उभारणी आणि देखभाल दुरूस्ती केली जाते. जालना जिल्ह्यातील विविध कंत्राटदार हे प्रारंभी टेंडर भरून काम मिळाल्यावर स्वत:च्या पैशातून ही कामे करतात. मार्च एन्डला ही बिले मिळतील या आशेवर हे कंत्राटदार कामे करतात. या कंत्राटदारांकडे जिल्ह्याचा विचार केल्यास पाच ते सात हजार मजुरांचा रोजगार अवंलबून असतो. यंदा ही देयके बीडीएस प्रणालीवर संबंधित विभागांनी २७ मार्च पूर्वी टाकणे बंधनकारक केले होते. असे असतांना अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे मिळालेला निधी परत गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

त्यात जालना विभाग क्रमांक एकचे जवळपास ४० कोटी आणि विभाग क्रमांक दोनचे ६ कोटी रूपये असे एकट्या बांधकाम विभागाचे ४६ कोटी रूपये तसेच या बांधकाम विभागा अंतर्गत येणाºया विद्युत विभागाचे सव्वा कोटी रूपये परत गेले आहेत. यामुळे कंत्राटदारांसह मजुरांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे सांगण्यात आले. हा बीडीएसवर परत गेलेला निधी मिळावा म्हणून दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांनी शासनाच्या अर्थ विभागाकडे पत्र व्यवहार केला आहे. परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परतूर येथील विभाग क्रमांक एकचे अभियंता तर पुणे येथून कार्यालयाचा पदभार चालवित असल्याचा आरोप आहे. या बाबत त्यांच्याशी शुक्रवारी परतूर येथील कार्यालयात संपर्क साधला असता, ते कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे सांगण्यात आले. तर जालन्यातील कार्यकारी अभियंता चांडक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बेजबाबदार अधिका-यावर कारवाईची मागणीबांधकाम विभागासह जिल्हा नगररचना विभागाचे ९४ लाख रूपये, वनविभागाचे २५ लाख रूपये देखील परत गेल्याचे सांगण्यात आले. एकीकडे निधी मिळवितांना कशी कसरत करावी लागते हे त्या विभागातील अधिकाºयांना चांगलेच ज्ञात आहे. असे असतांनाही केवळ बेफिकीरी वृत्तीमुळे जिल्ह्याला मिळालेला निधी परत गेल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या बेजबादार अधिकाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाfundsनिधीMONEYपैसा