शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पीककर्ज वाटपाची गती वाढवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:31 AM

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.गुरूवारी बँकर्सची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.गुरूवारी बँकर्सची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांनी आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीककर्जाची माहिती दिली. यावेळी एसबीआय, देना बँक तसेच युनियन बँकसेह अन्य बँकांची पीककर्ज वाटपाची गती ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने जास्तीचे मनुष्यबळ वाढवून शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. तसेच यात दिरंगाई करणा-या बँकांची तक्रार त्यांच्या मुख्यालयाकडे करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिला.यावेळी १८ जून रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शेतक-यांसाठी कर्ज मिळण्यासाठी मेळावे घेण्याचा निर्णय बैठकीत देण्यात आला.खरीप हंगामासाठी यंदा बाराशे कोटी रूपयांचे पिककर्ज वाटापाचे उद्दिष्ट असल्याचे इलमकर यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत एसबीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापकांनी मनुष्यबळ तातडीने वाढण्यात येईल असे सांगितले. बैठकीस जिल्हा सहनिबंधक नारायण आघाव यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक यांच्यासह प्रशासकीय अधिका-यांची उपस्थिती होती.आढावा : उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नांची गरजजालना जिल्ह्याच्या कृषीपत आराखड्यात यंदा खरीप हंगामासाठी एक हजार २४५ कोटी रूपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, आता खरीप हंगाम सुरू झाला असून, आता पर्यंत केवळ दहा टक्के एवढेच कर्जाचे वाटप झाले आहे. शेतकºयांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे म्हणून यंत्रणेने आळस झटकून करावे, असे जिल्हाधिका-यांनी या बैठकीत सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना