शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जांब समर्थची ‘ती’ अनोखी संक्रांत कायम स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:57 AM

संक्रांत म्हणजे महिलांसाठी एक प्रकाराचा भेटी-गाठींचा सण म्हणूनही ओळखला जातो.

जालना : तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला एवढाचा संक्रांतीच्या सणाचा अर्थ नाही. या हिंदू संस्कृतीत महिलांसाठी महत्त्वाची असलेली संक्रांत तेवढीच पुरूषांसाठी देखील महत्त्व ठेवते. घर, समाजातील ज्येष्ठांकडून तिळगूळ घेऊन आपण आशीर्वाद घेत असतो. या सणाला वाण देण्याची एक मोठी परंपरा आहे, ती आजही जोपासली जाते. संक्रांत म्हणजे महिलांसाठी एक प्रकाराचा भेटी-गाठींचा सण म्हणूनही ओळखला जातो. या सणा निमित्त एकमेकींकडे हळदी-कुंकवासाठी जाण्याची पध्दत आहे. संक्रांत सण आला की, मला एक दहा वर्षापूर्वीची आठवण नेहमी ताजी होते, प्रसिध्द नाट्य लेखक प्रा. राजकुमार तांगडे हे मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थचे आहेत. जांब समर्थ हे रामदास स्वामींचे जन्मगाव होय, या गावात मी आणि माझे पती हे दोघेही तांगडेंकडे कामानिमित्त गलो होतो. त्यावेळी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो असता, तेथे संक्रांतीला मंदिरातील दर्शन आटोपल्यावर पत्नीच्या पायावर डोके ठेवून पतीने पाया पडण्याची परंपरा आहे. यामुळे आम्ही हे एकूण अवाक झालो. ही परंपरा येथे यामुळे असावी, की समर्थ रामदास स्वामी हे ऐन लग्न मंडपातून निघून गेले होते. त्यामुळे त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी आपल्या दर्शनसाठी आलेल्या पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहावे म्हणून पतीने या मंदिरात पत्नीच्या पाया पडण्याची प्रथा रूजली असावी, अशी आख्यायिका आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीWomenमहिलाSocialसामाजिक